जिथं आपली ताकद जास्त तिथं कोणाचीही मदत न घेता जागा लढवायची- अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आढावा बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन अजित पवारांनी केले. ‘राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची … Read more

जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई :  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार, खासदार अजूनही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण … Read more

“अशा आमदारांना राज्यपाल शपथ देणार असतील तर डॉ. आंबेडकरांची घटना उद्धवस्त झाली…”

मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत विधानसभा उपाध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखामध्ये न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हंटले आहे. तसेच भाजपवर सडकून टीका देखील केली आहे. महाराष्ट्रातील सरकारच्या भवितव्याचा फैसला 11 तारखेस सर्वोच्च न्यायालयात होणार होता, पण फैसला पुढे ढकलण्यात … Read more

भाजपसोबत युती करण्याची सेना खासदारांची मागणी; उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अखेरीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी अधिक माहिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. नैसर्गिक युती करावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी पक्ष प्रमुखांना बैठकीत केली. भाजपसोबत युतीमध्ये असताना आलेले … Read more

मुर्मूंना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा असे नाही; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राऊतांचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रपती निवडणूक, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, एकनाथ शिंदे गट, ठाकरे गटांची एकमेकांवर टीका टिपण्णी अशा अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व विषयांवर भाष्य केले आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होते नाही, असे वक्तव्य संजय … Read more

“जो पक्षाचा अन् पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत संजय राऊत”

मुंबई : राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. ‘जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत मी असतो. संजय राऊत नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही’, असा दावा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन निर्णय … Read more

“उद्धवसाहेबांना आता शरद पवार जवळचे झालेत अन् आम्ही दूरचे”

मुंबई : शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडल्याने अवघ्या महाराष्ट्रात या विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर गटाने मुंबईत पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बोलताना एक खंत बोलून दाखवली आहे. ‘कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. … Read more

धनुष्यबाण नेमका कोणाचा? सेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धुनष्यबाण यावरुन आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर आपला हक्क बजावला जात आहे.शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाण्याची चिन्ह दिसत असतानाच आता शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक याचिका दाखल केले आहे. शिवसेनेने केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ … Read more

“न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता काही अर्थ नाही”

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आता एकनाथ शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वांनाच आता दिलासा दिला आहे. न्यायालयाची भूमिका योग्य आहे. शिवसेनेने … Read more

आधी ठाकरेंकडे या म्हणत रडणारे संतोष बांगर आता उद्धव ठाकरेंनाच म्हणाले, ‘दृष्टीकोन बदला’

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संजय बांगर आक्रमक झाले आहेत. बांगर यांच्या समर्थनार्थ मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली होती. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी प्रसारमाध्यमांमध्ये मला पदावरुन हटवण्यात आल्याचे वृत्त … Read more

सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्णय न घेण्याचे आदेश; शिवसेनेची नाराजी

मुंबई : शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले आहे त्याच्या मुळावर घाव … Read more

राजभवनाचा वापर करुन भाजप-शिंदे सरकार लादलं; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. राज्यात भाजपसोबत हातमिळवणी करत शिदे गटाने सरकार स्थापन केले. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत … Read more

बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे … Read more

तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी … Read more

ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडला तेव्हा महिला रडत होत्या, त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील- संजय राऊत

नाशिक : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. अनेक विषयांवरुन सेनेमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. बंडखोरांनी रोखठोक भाष्य करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. संजय राऊत आज नाशिकमध्ये सभेसाठी गेले असून सभेमध्ये बोलताना बंडखोर आमदारांवर राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं … Read more

“शिवसेना आमच्याच बापाची, बंडखोरांना ५० खोके पचणार नाहीत”

नाशिक : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील वाद शिगेला पोहचला आहे. बंडखोरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संबंधित बंडखोर आमदार अद्याप आम्ही शिवसेनेत आहोत, असा दावा करत असले तरी शिवसेनत फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. ४० आमदार एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य … Read more

ठाकरे-शिंदेंनी एकत्र यावं, हीच आमची भूमिका; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. सध्या शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन वाद तु तु मै मै सुरु आहे. शिंदे गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. त्यावरुन आता शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी वक्तव्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

“शिवसेनेचे हायकमांड ‘मातोश्री’वर, दिल्लीत नाही, ते भाजपचे मुख्यमंत्री”

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कोणी म्हणत असेल मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेचं सरकार आहे. तर ते चुकीचे आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईमध्ये आहे. … Read more