दिल्ली : हवामानाचे देशातील बदलते स्वरूप पाहून सरकारने मान्सून सक्रिय होण्याच्या (१ जून) व तो परत जाण्याच्या (१ सप्टेंबर) तारखांत बदल करण्याच्या मुद्यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे.
नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याच्या व ते परत जाण्याच्या तारखांची समिक्षा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गाडगीळ समितीने यासंबंधी सकारात्मक शिफारस केल्यास पुढील वर्षापासून मान्सूनच्या वेळापत्रकांत योग्य तो बदल केला जाईल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
‘स्वातंत्र्यानंतर १९५० च्या दशकात हवामान विभागाने देशात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याची तारीख १ जून व ते परतण्याची तारीख १ सप्टेंबर निश्चित केली होती. दर १० वर्षांनी या पूर्वनियोजित तारखांचा फेरआढावा घेतला जातो.
पण, अद्याप त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही’, अशी माहिती हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली
- पोस्ट ऑफिस की बँकेची आरडी योजना, कुठे मिळणार जास्तीचा परतावा ? वाचा डिटेल्स
- NCCS Pune Bharti 2024 : पुण्यातील NCCS मध्ये ‘या’ रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखतीचे आयोजन; बघा शैक्षणिक पात्रता…
- Ahmednagar News : अहमदनगरमधील धक्कादायक घडामोडी ! विसापूर कारागृहातून आरोपी फरार, तर नगरमध्ये पत्नी, मेव्हण्यावर पतीकडून कुऱ्हाडीने सपासप वार
- Pune Bharti 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे शिक्षक पदाच्या जागेसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर…
- कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 12 मे ला लॉन्च होणार मारुती सुझुकीची ‘ही’ भन्नाट कार, फिचर्स आणि किंमत पहा….