जामखेड :- तीन वेगवेगळ्या घटनांत बालिका, शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
पहिली घटना भुतवडा येथे घडली. शनिवार आदिती हनुमंत मोरे (१२ वर्षे) ही मुलगी आईबरोबर शेतात गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास आईने तिला शेजारी असलेल्या भुतवडा तलावात पाणी आणण्यासाठी पाठवले. ती आपल्या लहान भावंडांना घेऊन पाणी आणण्यासाठी गेली.
आदिती तलावात पाणी काढण्यासाठी उतरली असता तोल जाऊन पाण्यात पडून बुडायला लागली. काठावर उभ्या असलेल्या भावंडांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी आदितीला तलावातून बाहेर काढले, मात्र तिचा मृत्यू झाला.
दुसरी घटना शेतकरी बाबासाहेब भिमराव डोके (४५ वर्षे) यांनी घरात कोणी नसताना समोर असलेल्या सिमेंटच्या कॉलमला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिसऱ्या घटनेत शनिवारी रात्री शहरातील बसस्थानकात घडली. पुणे – बीड (एमएच ०६, बीडब्ल्यू ०९४०) या शिवशाही बसचा चालक गाडी पाठीमागे घेत असताना मागील चाकाखाली एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
- पुणे रिंगरोड भूसंपादनाबाबत खेड व हवेली तालुक्यातील ‘या’ गावांच्या शेतकऱ्यांना लागली लॉटरी! भूसंपादनाचा पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा
- सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये काही बदल झाल्यास तात्काळ कळेल तुम्हाला माहिती! भूमी अभिलेख विभाग आणणार ‘ही’ सुविधा
- भोगवटादार वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरणासाठी मिळणाऱ्या सवलतीपासून अनेकजण मुकण्याची शक्यता, राज्य शासनाच्या या आदेशामुळे…..
- अहमदनगर ब्रेकिंग : विवेक कोल्हे लढविणार ही मोठी निवडणूक ! आमदार होणार ?
- SUV खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! महिंद्रा कंपनीने ‘या’ कारच्या किमतीत केली मोठी वाढ