Monsoon Update: आला रे पंजाबरावांचा अंदाज आला…! ‘या’ तारखेला पावसाचं आगमन होणारं, सावध व्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस ओसरला आहे. त्यापूर्वी मात्र गेल्या दोन आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस (Rain) बघायला मिळाला होता.

राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी सारखा देखील पाऊस (Monsoon) झाला यामुळे पूरसदृश्य परिस्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्माण झाली होती. मात्र सध्या पावसाची उघडीप आहे यामुळे शेती कामाला वेग आला आहे.

मात्र ज्या भागात अतिवृष्टी सारखा पाऊस (Monsoon News) झाला आहे तेथील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. तसेच पावसाची उघडीप झाल्याने आता पिकांवर रोगराईचे देखील सावट निर्माण झाले आहे.

यामुळे बळीराजा आता पीक व्यवस्थापनाच्या कार्याकडे सरसावला असल्याचे चित्र राज्यात आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यातील शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचा इशारा यावेळी दिला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते पुढील चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार त्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी केला आहे.

मित्रांनो आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक कमावलेल्या पंजाबराव डख साहेबांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) देखील यावेळी सार्वजनिक करण्यात आला आहे. हवामान तज्ञ परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या मते, आज आणि उद्या राज्यात पाऊस नसणार.

आज आणि उद्या राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे मात्र, परवा म्हणजेच 24 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. 24 25 आणि 26 जुलै हे तीन दिवस राज्यात पावसाचे राहणार आहेत.

या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार त्याची मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवली आहे. 26 तारखे नंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे.

26 आणि 27 हे दोन दिवस राज्यात पाऊस नसणार मात्र, 28 29 आणि 30 जुलै हे तीन दिवस पुन्हा राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांनी वर्तवली आहे. मात्र या कालावधीत पाऊस पूर्व विदर्भ आणि पश्‍चिम विदर्भ या विभागात जास्त राहणार आहे.

राज्यातील इतरही चिञात या कालावधीत पाऊस कोसळेल मात्र विदर्भात याचे प्रमाण अधिक राहणार आहे. दरम्यान पंजाबराव यांच्या मते या कालावधीत कोसळणारा पाऊस हा राज्यात सर्वत्र राहणार नाही. यामुळे निश्चितच पावसामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत.