Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज…! उद्या कोसळणार धो-धो पाऊस, वाचा पंजाबरावांचा मान्सून अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाची (Rain) सर्वत्र हजेरी बघायला मिळत आहे. खरं पाहता राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन जुनच्या दहा तारखेला झाले मात्र मध्यंतरी मान्सूनच्या (Monsoon News) पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने बराच काल राज्यात मान्सूनचा पाऊस जणूकाही गायब झाला होता. मात्र जुनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आणि राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची पुन्हा एकदा हजेरी लागली.

यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे भाव उमटू लागले आहेत. मात्र असे असले तरी राज्यात अजूनही अनेक ठिकाणी पावसाच्या सऱ्या बघायला मिळाल्या नाहीत. यामुळे राज्यातील काही भागात पेरणीची कामे सुरू असून काही भागात अजूनही पेरणी बाकी आहे.

अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधव मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण राज्यात आपल्या नावाचा डंका वाचवणाऱ्या पंजाबराव डख साहेबांचा मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) सार्वजनिक करण्यात आला आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांच्या सुधारित मान्सून अंदाजानुसार, राज्यात आज आणि उद्या अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

याशिवाय पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार राजधानी मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये मोठा पाऊस असणार आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी यावेळी पावसाची जोरदार हजेरी राहणार आहे.

पंजाबराव डख (Panjab Dakh Weather Report) यांच्या मते, राज्यात रोजच भाग बदलत पाऊस पडणार आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस हा दररोज पडणार आहे मात्र मान्सूनचा पाऊस रोजच भाग बदलणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान 30 जून ते पाच जुलै आधार पावसाची शक्यता असून दहा जुलै पर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस होणार असल्याचे भाकीत पंजाबराव यांनी वर्तवले आहे. अर्थातच सलग पंधरा दिवस राज्यात मान्सून धारा बरसणार आहेत. राज्यातील शेतकरी बांधव सध्या पेरणीची कामे करत आहेत.

अनेक ठिकाणी पेरणीपूर्व कामे सुरू असून काही ठिकाणी पेरणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे यामुळे उकाड्याने हैराण झालेली जनता आता समाधानी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना पेरणी करण्यापूर्वी जमिनीची ओल तपासण्याचा सल्ला दिला आहे. पंजाब रावांच्या मते शेतकरी बांधवांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.

याशिवाय राज्यातील कृषी विभागाने तसेच हवामान विभागाने देखील शेतकरी बांधवांना काहीसा असाचं सल्ला दिला आहे. निश्चितच पंजाबराव यांच्या या सुधारित मान्सून अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून आता शेतकरी बांधव समाधानी असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.