Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला…! आज राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, वाचा पंजाबरावांचा आजचा मान्सून अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मोसमी (Monsoon) पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून राज्यात पेरणीच्या कामाला मोठी गती मिळाली आहे.

मात्र राज्यात अजूनही अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस (Rain) झालेला नाही यामुळे राज्यातील अनेक भागात अजूनही पेरणीची कामे खोळंबली आहेत. मित्रांनो काही ठिकाणी शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट देखील ओढावले आहे.

अशा परिस्थितीत राज्यातील अनेक भागातील शेतकरी बांधवांना अजूनही मोसमी (Monsoon News) पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची अजून पेरणी झालेली नाही असे शेतकरी बांधव मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण राज्यात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख साहेबांचा नवीनतम अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता सार्वजनिक करण्यात आला आहे.

शेतकरी बांधव ज्या पद्धतीने भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाकडे बारीक लक्ष ठेऊन असतात अगदी त्याच पद्धतीने शेतकरी बांधव पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी देखील मोठे उत्सुक असतात.

राज्यातील शेतकरी बांधवांचा हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांच्या हवामान अंदाजावर मोठा विश्वास आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनी सार्वजनिक केलेल्या नवीन अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), आज 30 जून रोजी राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

शिवाय पंजाबराव यांच्या मते, उद्यापासून पाच जुलैपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून रोजच भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबराव यांच्या मते जुलै महिन्यात 10 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस पडणार आहे. म्हणजेच जवळपास राज्यात 10 दिवस सलग पाऊस कोसळणार असल्याचे डख यांचे म्हणणे आहे.

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, आज 30 जून रोजी उत्तर महाराष्ट्रात विशेषता धुळे नंदुरबार आणि नाशिक या तीन जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. निश्चितच पंजाबराव यांनी वर्तवलेल्या या सुधारित मान्सून अंदाजामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे भाव मिळणार आहेत.

दरम्यान पंजाबराव डक साहेबांनी शेतकरी बांधवांना जमिनीची ओल तपासूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभाग तसेच राज्याचे कृषी विभाग यांनी देखील शेतकरी बांधवांना जमिनीची ओल तपासून तसेच 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. निश्चितच ज्या शेतकरी बांधवांची पेरणी झालेली नसेल त्यांनी या सल्ल्याचे अनुकरण करावे असे कृषी तज्ञ नमूद करत आहेत.