Monsoon Update: आला रे…! आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, पंजाबरावांचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: सध्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोसमी (monsoon news) पावसाच्या संत धारा बघायला मिळत आहेत. खरं पाहता जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून राज्यात सर्वत्र मोसमी पाऊस बघायला मिळत आहे. जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात राज्यात मान्सूनची (monsoon) एन्ट्री झाली खरी मात्र जूनचा पहिला पंधरावडा महाराष्ट्रातील जनतेला पावसाविनाचं (rain) काढावा लागला.

मात्र जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून राज्यात पुन्हा एकदा मोसमी पावसाचा जोर वाढला. सध्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी बांधव आनंदी असल्याचे चित्र आहे तर अनेक ठिकाणी पावसाच्या या विक्राळ स्वरूपामुळे नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाचवणाऱ्या पंजाबराव डख यांचा अंदाज समोर आला आहे.

पंजाबराव डख आपल्या हवामान अंदाजामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक परिचयाचा चेहरा आहे. शेतकरी बांधव पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर (panjabrao dakh havaman andaz) गाढा विश्वास ठेवत असतात.

शेतकऱ्यांच्या मते पंजाबराव यांचा हवामान अंदाज (panjab dakh weather report) अत्यंत तंतोतंत खरा ठरत असून याचा त्यांना फायदा होत आहे. पंजाब राव (panjabrao dakh) यांनी आता जुलै महिन्यातील आपला सुधारित अंदाज सार्वजनिक केला आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाबराव (panjabrao dakh news) यांचा जुलै महिन्यातील सुधारित मान्सून अंदाज.

काय म्हटले पंजाबरावं

पंजाबराव यांच्या मते, राज्यात पाच जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. आता 5 जुलैपासून राज्यात सर्वत्र मान्सूनचा जोर बघायला मिळेल मात्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र या विभागात मोसमी पाऊस अधिक राहणार असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव यांनी सांगितले.

पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार, पाच जुलै ते 12 जुलै या दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पाच जुलै ते 12 जुलै यादरम्यान उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सऱ्या बरसणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

यामुळे निश्चितचं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत. सध्या ज्या शेतकरी बांधवांची पेरणी खोळंबली आहे असे शेतकरी बांधव पावसाची वाट पाहत आहेत. शिवाय ज्या शेतकरी बांधवांची पेरणी झाली आहे, असे शेतकरी बांधव सुद्धा पिकाच्या जोमाने वाढीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत पंजाबराव यांचा हा हवामान अंदाज निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.