Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला हं…! 5 जुलै पर्यंतचा मान्सून अंदाज जारी, वाचा काय म्हणतायं पंजाबराव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: जूनचा पहिला पंधरवडा राज्यात जवळपास कुठेच पाऊस (Rain) बघायला मिळाला नाही. यामुळे शेतकरी बांधवांची पेरणीची कामे खोळंबली होती. मात्र जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने आणि मोसमी (Monsoon News) पावसाला चांगले पोषक वातावरण तयार झाल्याने आता मोसमी पावसाच्या धारा बरसू लागल्या आहेत.

यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट बघायला मिळत आहेत. शिवाय राज्यातील शेतकरी बांधव पेरणीच्या कामासाठी लगबग करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमावस्याच्या काळोखा प्रमाणे भासणारे शेतीशी निगडित व्यवसाय आता पुन्हा एकदा उभारी घेऊ लागले आहेत, शेती संबंधित उद्योग-धंद्यात आता पुन्हा एकदा तेजी बघायला मिळत आहे.

आता राज्यात जवळपास रोजच मोसमी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, आपल्या हवामान अंदाजा मुळे संपूर्ण राज्यात या नावाचा डंका वाजवणाऱ्या परभणीचे भूमिपुत्र पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांचा नवीनतम सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

पंजाबराव साहेबांनी (Panjabrao Dakh News) आपला सुधारित 5 जुलै पर्यंतचा अंदाज आता जाहीर केला आहे. चला तर मग शेतकरी मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाबराव यांचा सुधारित नवीनतम मान्सून अंदाज.

काय म्हणतोय पंजाबरावांचा अंदाज…!

पंजाब रावांच्या नवीन मान्सून अंदाजानुसार(Panjabrao Dakh Havaman Andaz), राज्यात दहा जुलै पर्यंत सर्वत्र भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे. दरम्यान 30 जून ते पाच जुलै जोरदार पावसाची शक्यता डख यांनी वर्तवली आहे.

पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report) आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्रात देखील 10 जुलैपर्यंत रोजच पावसाची हजेरी राहणार असल्याचे डख यांनी नमूद केले आहे. मात्र पाऊस हा रोजच भाग बदलत पडणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले.

पंजाब रावांच्या मते, 1, 2, 3, 4, व 5 जुलै राज्यात जोरदार पाऊस राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांची पेरणी पाच जुलैपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास देखील पंजाब राव यांनी यावेळी वर्तवला आहे.