Changes From 1 September : आजपासून ‘हे’ महत्वाचे 7 नियम बदलले, तुमचे आर्थिक नुकसान होण्याआधी जाणून घ्या नवे नियम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Changes From 1 September : आज 1 सप्टेंबर असून बँकेपासून ते घरातील गॅस सिलेंडरपर्यंतचे (gas cylinder) महत्वाचे बदल (Important changes) झाले आहेत. त्यामुळे तुमचे नुकसान होण्याआधी हे नवे नियम (New Rules) तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत) 1 सप्टेंबरपासून 91.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आता दिल्लीत त्याची किंमत 1885 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

पूर्वी हा सिलेंडर 1976.50 रुपयांचा होता. सलग पाचव्यांदा व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मे महिन्यात सिलिंडरची किंमत 2354 रुपयांवर पोहोचली होती.

यमुना एक्स्प्रेस वेवर 1 सप्टेंबरपासून नवीन टोल टॅक्स(Toll tax) भरावा लागणार आहे. नवीन नियमानुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर 1 सप्टेंबरपासून प्रति किलोमीटर 10 पैसे अधिक मोजावे लागणार आहेत.

त्याचबरोबर व्यावसायिक वाहनांना प्रति किमी 52 पैशांपर्यंत अधिक टोल टॅक्स भरावा लागणार आहे. याशिवाय अनेक महामार्गांवर टोलचे दरही वाढवण्यात आले आहेत.

जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. गाझियाबादच्या जमिनीचा सर्कल रेट 1 सप्टेंबरपासून वाढला आहे. आगामी काळात इतर शहरांचे सर्कल रेटही वाढण्याची शक्यता आहे. सर्कल रेट 2 ते 4 टक्क्यांनी वाढवला आहे.

1 सप्टेंबरपासून तुमच्या विमा पॉलिसीचा प्रीमियम कमी होईल. IRDA ने जनरल इन्शुरन्सच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांनंतर 30 ते 35 टक्क्यांऐवजी आता ग्राहकांना एजंटला फक्त 20 टक्के कमिशन द्यावे लागणार आहे. याचा परिणाम प्रीमियमवर होणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी (customers of Punjab National Bank) केवायसी अपडेट करण्याची तारीख 31 ऑगस्ट होती. तुम्ही तुमचे KYC अजून अपडेट केले नसेल तर तुमचे खाते ब्लॉक होऊ शकते. म्हणजेच, तुम्हाला खाते ऑपरेट करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत खाते उघडण्यासाठी पॉइंट ऑफ प्रेझेन्सला कमिशन दिले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की NPS मध्ये गुंतवणूकदारांना नोंदणी आणि इतर सुविधा केवळ PoP द्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. आजपासून पीओपीला 10 रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंत कमिशन दिले जाईल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट होती. सरकारने वारंवार तारीख वाढवूनही तुम्‍हाला केवायसी करता आले नाही, तर तुम्‍हाला 12व्‍या हप्‍त्‍याचा लाभ मिळणार नाही. सरकार फक्त केवायसी (e-Kyc) पूर्ण करणाऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करेल.