dhanush aishwarya divorce : अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांनाही विरंगुळा मिळाला नाही की साऊथ इंडस्ट्रीतील आणखी एका पॉवर कपलने घटस्फोटाची घोषणा केली आहे.

अभिनेता धनुषने पत्नी ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची बातमी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कोलावरी डी’ या गाण्यानं सर्वांना वेड लावणाऱ्या साउथ स्टार धनुष (Dhanush ) आणि ऐश्वर्याबद्दल (Aishwarya) धक्कादायक बातमी आहे.

धनुष आणि ऐश्वर्याने वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. धनुष ने इन्स्टाग्राम वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे कि, “१८ वर्षांच्या सहवास, मैत्री, जोडपे बनणे, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक, आम्ही वाढीचा, समजूतदारपणाचा, भागीदारीचा प्रवास केला.

आज आपण तिथे उभे आहोत जिथे आपले मार्ग वेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळे होऊन आपण स्वतःला शोधू. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमची गोपनीयता लक्षात घेऊन आम्हाला ते हाताळू द्या. ऐश्वर्या साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे.

दोघांनी 2004 मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. यादरम्यान अनेकवेळा या कपलच्या विभक्त झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र अनेकदा ते मीडियाच्या प्रश्नांना टाळताना दिसले. धनुषचे लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली मुलगी ऐश्वर्याबरोबर 18 नोव्हेंबर 2004 मध्ये झाले.

त्यांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली होती.धनुष आणि ऐश्वर्या दोन मुलांचे आई-वडील असून त्यांच्या मुलांची नावे याथरा आणि लिंगा अशी आहेत. धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू आहे. कस्तूरी राजा यांच्या ‘आदुकलाम’ (2011) या सिनेमात धनुषने काम केले होते. या सिनेमातील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्याचे कौतुक केले होते.

या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. धनुष आणि ऐश्वर्याची पहिली भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. धनुषने याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होते की, ‘‘काढाल कोंडे’ हा सिनेमा सहपरिवार पाहायला गेला होता.

तेव्हा सिनेमाहॉलच्या मालकाने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि सौंदर्या हिची ओळख करून दिली होती. त्यावेळी आमच्यात फक्त हाय हॅलो झालं. नंतर सकाळी ऐश्वर्या मला दुसऱ्या दिवशी एक फुलांचा बुके पाठवला. त्यानंतर आम्ही भेटत राहिलो. ती माझ्या बहिणीची मैत्रिण देखील होती.

नंतर आमची मैत्री झाली. त्यावेळी धनुष त्याच्या सिनेमामुळे चर्तेत होता. तर ऐश्वर्या फिल्म डायरेक्टर असल्यासोबत रजनीकांत यांची मुलगी असल्यामुळे देखील चर्चेत होती.

दोघे चांगले मित्र होते मात्र दोघांच्यात काही तरी शिजत असल्याची सतत मीडियात चर्चा होती. या अफवांच्यामुळे दोन्ही कुटुंबातील लोक वैतागले होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.