Lifestyle News : सफरचंद खाऊन लगेच पाणी पिताय? तर वेळीच व्हा सावध; नाहीतर होईल गंभीर नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lifestyle News : सफरचंद (apple) हे सर्वांच्याच घरी असते. अनेकांना सफरचंद खायला आवडते. तसेच सफरचंदामधून अनेक पोषक घटक (nutrients) मिळत असतात. त्यामुळे अनेक वेळा डॉक्टरही सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात. मात्र सफरचंद खाल्ल्यानंतर तुम्हालाही पाणी (Water) पिण्याची सवय असेल तर ती लगेच सुधारा नाहीतर गंभीर नुकसान (serious damage) होऊ शकते.

सफरचंदामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-सिक्स इत्यादीसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

पण अनेकदा लोक एकामागून एक अशा पदार्थांचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांना त्यातील पोषक तत्वांची पूर्ण फळे मिळत नाहीत. त्यातील एक गोष्ट म्हणजे पाणी. सफरचंद खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.

सफरचंद खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये?

सफरचंद खाल्ल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने पाणी पिले तर पोटाची पीएच पातळी कमी होऊ लागते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पोटाची पीएच पातळी काय आहे. तर जाणून घेऊया की सामान्य pH पातळी अम्लीय मानली जाते.

अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती सफरचंद खाऊन त्यावर पाणी पितात, तेव्हा त्यात असलेली नैसर्गिक साखर आणि यीस्ट अॅसिड पातळ करते, त्यामुळे पोटात यीस्ट वाढू लागते.

सफरचंदानंतर पाणी पिण्याचे इतर तोटे

  1. सफरचंद खाल्ल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने पाणी प्यायले तर त्यामुळे अॅसिडीटी तर होतेच पण छातीत जळजळही होऊ शकते.
  2. सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया प्रभावित होते, तसेच व्यक्तीला पोटदुखी, अपचन अशा समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
  3. सफरचंदा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने एखाद्या व्यक्तीला उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता किंवा मळमळ या समस्यांचा सामना करावा लागतो.
  4. जर एखाद्या व्यक्तीने सफरचंदा खाल्ल्यानंतर पाणी पिले तर त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत मधुमेही व्यक्तीने सफरचंदा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे.