पारनेर : राजकीय पक्ष आणि पार्ट्यांमुळे खेड्यांचा विकास थांबला आहे. पर्यायाने देशाच्या विकासाला खीळ बसली प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी हजारे बोलत होते.
या वेळी महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष कैलास पटारे, उपाध्यक्ष रोहिणी गाजरे, संघटक प्रवीण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे, राजाराम गाजरे व विविध जिल्ह्यांतील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
हजारे म्हणाले, गावातील एक गट चांगला काम करत असेल, तर दुसरा गट त्याला विरोध करतो. कारण पक्ष आणि पार्टीमुळे गावातील लोक दोन गटांत विभागले गेलेले आहेत.
गावातील लोकांनी घटनेच्या कलम ८४ ‘ख’ व ‘ग’ नुसार पक्ष-पार्टीविरहित निवडणूक लढवण्याचे आवाहन हजारे यांनी केले. असे झाले तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल.
- Maharashtra Data Entry Operator : महाराष्ट्रातील तालुका व जिल्ह्यांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी निघाली भरती; बघा शैक्षणिक पात्रता
- यात्रेच्या कार्यक्रमात महिला सरपंचाचा विनयभंग
- Gokhale Institute Pune : पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली आहे भरती; वाचा सविस्तर…
- प्रमोद महाजनांची मुलगी पूनम महाजनांचा पत्ता कट करत उज्वल निकम यांनाच उमेदवारी का ? महाराष्ट्रात ‘या’ जागेंवर होणार फायदा, भाजपचे राजकीय गणित
- महाविकास आघाडीच्या बॅनरवर राजीव राजळेंचा फोटो