वैराग (सोलापूर): कोणत्या पक्षावर बोलावे यावर बार्शी तालुक्यात येण्यापूर्वी बाहेरच्या नेत्यांना विचार करावा लागतो. पराभव रणात नाही तर मनात होतो. त्यातूनच त्यांना पराभवाची जाणीव झाल्यामुळे दल बदलूंनी पक्ष बदलला, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वैराग येथे केली.
राष्ट्रवादीचे बार्शीचे उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर यांच्या प्रचारार्थ बोलताना ते पुढे म्हणाले, ही निवडणूक दोन विचारांची आहे. तरुणांच्या आणि महाराष्ट्राच्या भवितव्याची आहे. पाच वर्षात सत्तेवर असलेल्या सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला.
प्रत्यक्षात कुणाच्याच पदरात काहीच पडले नाही. मात्र आमची सत्ता येताच तिन महिन्यात सात-बारा कोरा, केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, उच्च शैक्षणिक कर्ज बिनव्याजी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- पोस्ट ऑफिस की बँकेची आरडी योजना, कुठे मिळणार जास्तीचा परतावा ? वाचा डिटेल्स
- NCCS Pune Bharti 2024 : पुण्यातील NCCS मध्ये ‘या’ रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखतीचे आयोजन; बघा शैक्षणिक पात्रता…
- Ahmednagar News : अहमदनगरमधील धक्कादायक घडामोडी ! विसापूर कारागृहातून आरोपी फरार, तर नगरमध्ये पत्नी, मेव्हण्यावर पतीकडून कुऱ्हाडीने सपासप वार
- Pune Bharti 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे शिक्षक पदाच्या जागेसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर…
- कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 12 मे ला लॉन्च होणार मारुती सुझुकीची ‘ही’ भन्नाट कार, फिचर्स आणि किंमत पहा….