राहाता :- तालुक्यातील गोगलगांव येथील तरुण शेतक-याने सततची नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. रवींद्र लक्ष्मण मगर (वय ३०) असे या शेतक-याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता.
रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे पदरी पडले नाही. यामुळे रवींद्र हा वैफल्यग्रस्त होता.
त्यातच दिवाळी सणाकरीता कुटूंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने तो ताणतणावात होता. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृध्द आई घरात झोपल्यानंतर रवींद्र्रने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.
- सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये काही बदल झाल्यास तात्काळ कळेल तुम्हाला माहिती! भूमी अभिलेख विभाग आणणार ‘ही’ सुविधा
- भोगवटादार वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरणासाठी मिळणाऱ्या सवलतीपासून अनेकजण मुकण्याची शक्यता, राज्य शासनाच्या या आदेशामुळे…..
- अहमदनगर ब्रेकिंग : विवेक कोल्हे लढविणार ही मोठी निवडणूक ! आमदार होणार ?
- SUV खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! महिंद्रा कंपनीने ‘या’ कारच्या किमतीत केली मोठी वाढ
- 50 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवणार लखपती ! गुंतवणूकदार अवघ्या 60 महिन्यात होणार मालामाल, कशी आहे योजना ?