जामखेड : हे सरकार स्वता:ला ओबीसीचे कैवारी म्हणवून घेत आहे.मात्र या युती सरकारने गेल्या पाच वर्षात ओबीसी महामंडळाला एक रुपयाचाही निधी दिला नाही. शेतकऱ्यांच्या १६ हजार आत्महत्या झाल्या, बेरोजगारी वाढली, उद्योगधंदे बंद पडू लागले, अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे. सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील फडणवीस सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. असा आरोप राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचर्थ आघाडीच्यावतीने जामखेड तालुक्यातील नान्नज येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी भूजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले सध्या देशात लोकशाही नाही तर हुकूमशाही चालत असून, यांच्या झुंडशाही विरोधात जर एखाद्याने तक्रार केली,अथवा कोणी काही बोलले की त्यांनाच देशद्रोही ठरवा असा प्रकार सध्या देशात सुरू आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे दमन करण्याचे काम सुरू आहे.
- Ahmednagar News : शेतात रोटा मारत होता शेतकरी, ट्रॅक्टर पलटी झाला अन त्याखाली दबून मृत्यू झाला
- Air Force School Pune Bharti : बी.एड झालेल्या उमेदवारांसाठी गोल्डन चान्स! पुण्यातील ‘या’ शाळेत निघाली भरती…
- Ahmednagar News : विहिरी कोरड्या, भूजल पातळी ९ मीटरपर्यंत खालावली ! ‘अशी’ आहे अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती
- Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून कमवा दुप्पट पैसे, आजच करा गुंतवणूक…
- अहो आश्चर्यम ! आंबा बागेच्या सुरक्षेला ११ विदेशी कुत्रे व ८ सीसीटीव्ही कॅमेरे, अडीच लाख रुपये किलोने विक्री..