धक्कादायक : वृद्धाला औषधोपचारांसाठी पुण्याला नेल्यावर कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :नेवासे तालुक्यातील भानस हिवरे येथील ७४ वर्षांच्या वृद्धाला औषधोपचारांसाठी पुण्याला नेल्यावर कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे नेवासे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठ झाली आहे. २९ मे रोजी मुंबईहून कारेगावला आलेल्या तरुणाला लागण झाल्याचे समोर आले होते. त्याच्याबरोबर आलेल्या आठ जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. … Read more

आता राजकीय सत्तेची आस नाही – माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : राजकीय वारसा नसताना मांडवगणसारख्या दुष्काळी भागाचे नेतृत्व करताना जि. प. अध्यक्षपदाच्या माध्यमातून लाल दिवा मिळाला. आता आयुष्याच्या सायंकाळी ६८ व्या वर्षी राजकीय सत्तेची आस नाही, असे माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी सांगितले. भोस आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धेश्वर मल्टिस्टेट, चैतन्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्हातील आरोपीस अटक !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कलिंगड व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्हातील मागील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपीस पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने मंगळवारी जेरबंद केले. २०१८ मध्ये मुंबई येथील कलिंगड व्यापारी हसन उमर शेख यांचा विकत घेतलेल्या कलिंगडाची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव ता. जामखेड) अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, … Read more

तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : शेततळ्याची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. अजय रामदास कुदनर असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ६ वाजता संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे घडली. सकाळी ६ च्या सुमारास वीज जाणार असल्याने अजय शेततळ्याची मोटार सुरू करण्यासाठी गेला होता. पाय घसरून तो शेततळ्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’ जावई झाला कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  पारनेर तालुक्यातील म्हसणे येथील जावयाने कोरोनावर मात केली. मंगळवारी दुपारी त्यास घरी सोडण्यात आले. १८ मे रोजी जावई कुटुंबासह म्हसणे येथे आला होता. घराजवळच त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तरुणास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मालवाहू वाहनातून पळवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यास पारनेर … Read more

अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट : एकाच दिवशी 20 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी २० ने वाढली त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या १७२ वर जाऊन पोहोचली आहे. नगर शहरातील मार्केट यार्ड भागातील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी तिघे पॉझिटिव्ह निघाले. मार्केट यार्डमधील २८ वर्षांचा युवक, माळीवाड्यातील ४२ वर्षांचा पुरुष व केडगावातील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली. बाधितांपैकी सात रुग्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 9 कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना बाधित रुग्णांची संख्या 172 !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : जिल्ह्यात आणखी ०९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह.सर्व बाधित रुग्ण यापूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नगर शहरातील सहा जणांचा समावेश.यात काल बाधित आलेल्या मार्केट यार्ड मधील व्यक्तीच्या कुटुंबातील तिघे बाधित. यात आई, पत्नी आणि मुलीचा समावेश. याशिवाय मार्केट यार्ड येथील 28 वर्षीय युवकही बाधित. माळीवाडा येथील … Read more

धक्कादायक! १०० रुपये लाच घेऊन दिल जातंय आरोग्य प्रमाणपत्र

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा जास्त प्रसार होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाणण्यासाठी ई-पास देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी लागणारे आरोग्य प्रमाणपत्र संबंधित विभागाकडून घेणे आवश्यक आहे. परंतु कोणतीही चाचणी न करता १०० रुपये घेऊन हे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील मुकुंदनगरमधील आरोग्य केंद्रात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुकानाला आग लागून ३५ लाखाचे नुकसान !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  जामखेड मधील येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळले नसले तरी या आगीत या दुकानाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत जामखेड पोलिसात प्रवीण उगले यांनी तक्रार दिली आहे. जामखेड-खर्डा रस्त्यालगत साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकान … Read more

विनापरवानगी गावाकडे आलेला ‘तो’ तरुण कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : शेवगाव तालुक्यातील राणेगावमधील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो विनापरवानगी गावाकडे आला होता. या रुग्णाच्या संपर्कातील 10 जणांना तपासणीसाठी नगरला हलविण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली आहे. सदर तरुण हा कल्याणहून रविवारी सायंकाळी विनापरवानगी गावाकडे आला होता. रात्रभर तो गावात राहिला. मात्र त्याला खोकल्याचा त्रास … Read more

महिलेचे फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून त्यांनी केले असे काही कि झाली जेलमध्ये रवानगी !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  संगमनेर मध्ये एका महिलेच्या नावाने  इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग वेबसाईट वर फेक अकाऊंट तयार करून तिची बदनामी करणाऱ्या दोघांना नगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. संकेत नानासाहेब गाडेकर (रा. राजापूर ता. संगमनेर), तेजस कैलास ससकर (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या प्रकरणी जानेवारीमध्ये बदनामी … Read more

सूर्यफुलांच्या बिया खाल्ल्यास कॅन्सरसह ‘हे’आजार होतील बरे

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :अनेक लोकांना सूर्यफुलांच्या बिया खाण्यासाठी आवडतात. या बियांपासून तेल बनतं, हे तेल आरोग्याला अतिशय उपयुक्त असतं. या बियांना आयुर्वेदातही महत्वाचे स्थान आहे. यांना अतिशय महत्त्वाचा दर्जा दिला गेला आहे. यात अनेक पोषक घटक असतात. या बिया शरीराला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतात. जाणून घेऊया फायदे-  १) रक्तदाब नियंत्रण सूर्यफुलांच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत असतो. या स्त्रोताचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. एका संशोधनानुसार सूर्यफुलांच्या बियांमध्ये असलेले इतर पौष्टिक तत्वांच्या मदतीने मॅग्नेशियम रक्त वाहिन्यांना अरुंद करत रक्त प्रवाह नियंत्रित करतं यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते. २) शुगर मेंटेन होण्यास मदत   सुर्यफुलांच्या बियांमध्ये रक्तातली साखर कमी करणारं क्लोरोजेनिक अॅसिड असते. हे अॅसिड ज्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तात जास्त साखर आहे ती कमी करून संभाव्य धोक्यांपासून बचाव करण्याचे काम करते.  जवळपास ३० ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने ६ आठवड्यांत १० टक्क्यांपर्यंत रक्तातली साखर कमी होऊ शकते. ३) हृदय रोगावर गुणकारी … Read more

तिखट-मीठ लावलेली कैरी आरोग्यास देते ‘हा’ फायदा

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : सध्या बाजारात कैऱ्या येण्याचाच सिझन सुरु आहे. अनेकांना जेवणासोबत कैरी असणे म्हणजे पाची पक्वान्न मिळाल्याचा आनंद असतो. तिखट मीठ लावलेली कैरी आरोग्यास खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला कैरीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. १) तोंड संबंधित आजार बरे होतात –    तोंडाला दुर्गंधी येत असेल तर कैरी खावी. याशिवाय हिरड्यांमधून रक्त येणं,  दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. मजबूत आणि स्वच्छ दात हवेत तर मग कैरीचं सेवन करावं. तोंडाच्या समस्या दूर करण्यासाठी कैरीचं सेवन फायदेशीर ठरतं. २) डिहाड्रेशनची समस्या दूर होते    उन्हाळ्यात शरीरातून घामावाटे अनेक मिनरल्स बाहेर पडतात. अशावेळी कैरी तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करते.  कैरीचा ज्युस प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या  उद्भवत नाही. शरीरात सोडियम आणि इतर मिनरल्सची पातळी नियंत्रणात राहते. ३) पोटाच्या समस्या दूर होतात  उन्हाळ्यात पचनसंबंधी समस्या उद्भवतात. यावर कैरी अत्यंत गुणकारी व फायदेशीर आहे. कैरीमुळे पाचकरसाची निर्मिती नीट होते आणि पचनप्रक्रिया सुरळीत पार पडते. मलावरोध, अपचन, एसिडीटी, हार्टबर्न, मळमळ अशा समस्या दूर होतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, रक्तप्रवाह सुरळीत राहतो परिणामी हृदयासंबंधी आजार दूर राहतात. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]Read more

‘या’ हार्मोन्समुळे महिलांचं वाढते वजन; करा ‘हे’उपाय

अहमदनगर Live24 ,2 जून 2020महिलांना वजनवाढीची समस्या असते. हार्मोनच्या पातळीतील चढ-उतारामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. जाणून घेऊयात या हार्मोन्सविषयी व उपायांविषयी –  १)    थायरॉइड   थायरॉइड ग्रंथीमुळे शरीरामध्ये तीन प्रकारचे हार्मोन तयार होते. ‘टी 3’, ‘टी 4’ आणि कॅल्सिटोनिन अशी हार्मोनची (संप्रेरके) नावं आहेत. शरीरातील इतर अंत:स्रावी ग्रंथी जशा मेंदूच्या नियंत्रणात असतात, त्याप्रमाणे थायरॉइड ग्रंथीही मेंदूतील पिटय़ुटरी ग्रंथीद्वारे नियंत्रित केल्या जातात.  याव्यतिरिक्त थायरॉइड हार्मोन (टी3 आणि टी 4) शरीराची चयापचय प्रक्रिया (मेटाबोलिझम), शरीराचे तापमान नियंत्रित राखणे, झोप, हृदयाची गती, शारीरिक आणि मेंदूचा विकास करण्याचंही कार्य नियंत्रित करत असतात. कधी-कधी थायरॉइड ग्रंथी या हार्मोनची योग्य प्रकारे शरीरात निर्मित करत नाही. ज्यामुळे हायपोथायरॉइडीसीम हा थायरॉइड संबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते. उपचार थायरॉइडसंबंधित आजारांची नियमित तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या फ्लावर, कोबी, ब्रोकोली, कांद्याची पात यांचे कच्च्या स्वरुपात सेवन करणं टाळा. भाज्या शिजवून खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरेल आयोडीनयुक्त मिठाचे सेवन करा झिंकयुक्त आहाराचे सेवन करा. उदाहरणार्थ शिंपल्या आणि भोपळ्याची बी फिश ऑइल आणि ‘व्हिटॅमिन डी’युक्त आहार घ्यावा. २) कॉर्टिसोल शरीरासाठी कॉर्टिसोल हे हार्मोन अतिशय गरजेचे आहे. कॉर्टिसोलचे खूप जास्त तसंच खूप कमी प्रमाण शरीरासाठी हानिकारक असते. ताणतणाव, शारीरिक दुखापत, नैराश्यामुळे कॉर्टिसोलचं शरीरात प्रमाण वाढू लागतं. उपाय  नियमित योगासने, ध्यानधारणा आणि व्यायाम करावा लोकांच्या बोलण्याचा गांभीर्यानं विचार करणं टाळावं सात ते आठ तासांची झोप घेणे मद्यपान, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा सकारात्मक विचारांवर भर द्या, नवीन गोष्टी शिकण्यामध्ये स्वतःला गुंतवा ३) मेलाटोनिन  शरीरात मेलाटोनिनची पातळी संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाढते आणि पहाटेच्या सुमारास ती कमी होते. यामुळे आपल्या शरीराला चांगले लाभ मिळतात. पण बहुतांश जणांना व्यस्त वेळापत्रकामुळे पुरेशी झोप मिळणं कठीण असते. परिणामी शारीरिक ताणतणाव वाढ झाल्यानं मेलाटोनिन हार्मोनच्या पातळीवर वाईट परिणाम होते. मेलाटोनिनची पातळ कमी झाल्यानं झोपेवर वाईट परिणाम होते. पुरेशा प्रमाणात झोप न झाल्यानं वजन वाढीच्या समस्या निर्माण होतात. शरीरात मेलाटोनिन हे एक झोपेचे रसायनं आहे. उपाय अंधाऱ्या खोलीत झोपा सात ते आठ तासांची झोप घ्या रात्री उशिरा अन्नपदार्थ खाणे टाळा झोपण्यापूर्वी मोबाइल बंद करा केळ, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करा ४) इन्सुलिन इन्सुलिन आपल्या शरीराच्या पेशींमध्ये ग्लुकोज वाहून नेण्याचं कार्य करते. ज्याचा शारीरिक ऊर्जेच्या स्वरुपात उपयोग केला जातो. पण रक्तामध्ये इन्सुलिनची पातळी वाढू लागल्यास वजन वाढणे आणि टाइप 2 मधुमेहाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी साखर, दारू आणि आरोग्यास अपायकारक ठरू शकतात अशा पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. उपाय आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्या आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आठवड्यातून चार तास व्यायाम करण्यावर भर द्या प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, मद्यपान, जंकफुड, प्रक्रिया करून तयार केलेले गोड पेये किंवा पदार्थांचं सेवन करणं टाळा हिरव्या पालेभाज्या, भाज्या आणि फळांचा आहारामध्ये समावेश करा शरीरातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडीची पातळी सुधारण्यासाठी मासे, सुका मेवा, ऑलिव्ह ऑईल आणि अळिवाच्या बियांचं सेवन करा. कमी कॅलरीयुक्त पदार्थांचांचे सेवन करण्यासाठी भर द्या. पौष्टिक पदार्थांचं सेवन वाढवा. तीन ते चार लीटर पाणी नियमित प्यायले पाहिजे अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन … Read more

सलग ३० दिवस आलं खा आणि पळवा ‘हे’ आजार

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : आले (ginger) हे बाराही महिने घरात उपलब्ध असते. भाजीमध्ये चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे. आपल्याकडे बऱ्याचदा खोकला, सर्दी-पडसे झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा (ginger juice) करून दिला जातो. बायोएक्टिव घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण … Read more

विखे – कर्डिले यांचे पुन्हा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’!

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुजय विखे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते. हा वाद थेट पक्षाच्या हाय कामांडपर्यंत गेला होता.परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा एकत्रित राजकीय सूर आळवायला सुरू केले आहेत. याला जिल्हा बँक निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आहे. कर्डिले यांचा सोमवारी वाढदिवस … Read more

शरीराच्या ‘या’ भागावर ‘हे’ तेल लावल्याने पडेल सौंदर्यात भर

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : आपण आपल्या आहारात खाद्य तेलांचा समावेश करतो.  या तेलांमध्ये असंख्य पोषक घटकांचा समावेश असतो, ज्यामुळे आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणात लाभ मिळतात.  या तेलाचा तुम्ही शरीराचा मसाज करण्यासाठीही वापर करू शकता. आयुर्वेदिक औषधोपचारांमध्येही या तेलांचा वापर केला जातो. ज्यामुळे शरीराराला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक फायदे मिळतात. जाणून घेऊया कोणत्या प्रकारचे तेल शरीराच्या कोणत्या भागावर लावल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. १) मोहरीचे तेल रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर नियमित मोहरीचे तेल लावल्यास ओठांचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल. ओठ कोरडे होणार नाहीत. शिवाय, त्वचेवर नॅचरल ग्लो येईल. याद्वारे तेलातील पोषक घटकांचा संपूर्ण शरीराला पुरवठा होण्यास मदत मिळते. २) बदाम तेल   बदामाचे तेल तुम्ही आपल्या नाभीवर लावल्यास तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. बदामाच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असते. हे घटक त्वचेसाठी सक्रिय स्वरुपात काम करतात, ज्यामुळे त्वचेचा रंग आणि पोत चांगला होण्यास मदत मिळते. ३) लेमन ऑइल लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी चे घटक असतात.  लेमन ऑइलमधील पोषण तत्त्वे तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये होणारे हानिकारक बदल रोखण्यासाठी सक्रिय स्वरुपात कार्य करतात. त्वचा विकार तसंच स्किन पिगमेंटेशनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या नाभीवर लेमन ऑइल लावून मसाज करायला विसरू नका. ४) कडुलिंबाचे तेल कडुलिंबाच्या तेलानं नाभीवर मसाज केल्यास चेहऱ्यावरील मुरुम तसंच त्यांचे डाग कमी होण्यास मदत मिळते. यामुळे चेहरा सतेज आणि तजेलदार राहण्यासही मदत मिळते. या तेलामध्ये मुरुमांविरोधात लढण्यासाठी पोषक घटक असतात. या तेलास किंचितसा उग्र सुगंध येतो. पण हे तेल वापरण्याचे फायदे असंख्य आहेत. ५) नारळाचे तेल नारळाच्या तेलामध्ये आरोग्यासह, केस तसंच त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या पोषक घटकांचा समावेश आहे. नारळाच्या तेलामुळे आपल्या केस आणि त्वचेला नैसर्गिक मॉइश्चराइझर मिळण्यास मदत होते.  ज्यामुळे कोरडे केस आणि त्वचेच्या समस्या दूर होऊ शकते. सुंदर केस आणि त्वचेसाठी नारळाच्या तेलाचा वापर करावा. जर तुम्हाला रात्रभर नाभीवर तेल लावून ठेवायचे नसल्यास दिवसभरात केवळ २० मिनिटांसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी कापसाच्या मदतीनं किंवा हातानं तेलाचे थेंब नाभीवर लावा आणि मसाज करा. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क … Read more

युवराज सिंगने घेतलं सर्वात महागडं घर, किंमत ऐकून चक्रावेल डोक

अहमदनगर Live24 ,2 जून 2020भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगने नुकतेच विराट कोहलीच्या बिल्डिंगमध्ये घर विकत घेतलं आहे. वरळीतील प्रसिद्ध ओमकार 1973 टॉवरमध्ये हे घर असून हे घर तब्बल 16 हजार स्क्वेअर फूट एवढं आहे. आर्किटेक्चरल डायजेस्ट यांनी दिलेल्या वृत्तानुसार या घराची किंमत 64 कोटी रुपये इतकी आहे. विराट कोहलीनं 2016मध्ये ओमकार टॉवर्समध्ये घर घेतले. कोहलीचे … Read more