शेतक-यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा
शेतक-यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन त्यांना शाश्वत आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासोबतच जे विकते ते पिकवायला शिकविण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापिठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 151 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.