त्या चारही आरोपींना विचारली शेवटची इच्छा तेव्हा म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत.

दरम्यान फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी प्रयत्न केले. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास दोषींची याचिका फेटाळून लावली होती. 

कालची रात्र दोषींसाठी काळरात्र ठरली. रात्री ते खूपच बैचेन दिसले. चार दोषींपैकी केवळ दोषी म्हणजे मुकेश आणि विनय यांनीच रात्रीचे जेवण केले.

दोषींना रात्रभर झोप लागली नाही. ते या कुशीवरुन त्या कुशीवर अशी शरीराची हालचाल करत राहीले.आज आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस याची त्यांना खात्री झाली होती. 

पहाटे फासावर लटकावण्याच्याआधी नाश्ता करणार का ? असे विचारण्यात आले. पण त्यांनी नाश्ता करण्यास नकार दिला. याआधी फाशीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

गुरुवारी तुरुंग प्रशासनाने आरोपींकडे तुमची शेवटची इच्छा काय आहे यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी चौघांनाही ‘काही नाही’ एवढेच उत्तर दिल्याचे समजते. या चौघांनाही शेवटची इच्छा नसल्याचं सांगितलं होत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment