‘या’ कारणामुळे तनपुरे कारखान्याचे गाळप थांबले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या टर्बाइनमध्ये बिघाड झाल्याने पुन्हा उसाचे गाळप थांबले आहे.

दरम्यान, या उसाची पर्यायी व्यवस्था प्रवरा सहकारी साखर कारखान्याकडे करण्यात आल्याने शुक्रवार सकाळपासून शनिवार सायंकाळपर्यंत उसाने भरलेल्या वाहनांचा राहुरी फॅक्टरीकडून प्रवरा साखर कारखान्याकडे प्रवास सुरू होता.

मशिनरीतील टर्बाइनमध्ये बिघाड झाल्याने हा तांत्रिक बिघाड काढण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. आज शनिवारी रात्रीपर्यंत साखर कारखाना सुरळीत चालू होईल, ही माहिती मिळाली आहे.

राहुरीच्या डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास महिन्याभरापासून सुरुवात झाली आहे. मात्र, कारखाना मशिनरीच्या बाॅयलर तसेच टर्बाइनमध्ये बिघाडाच्या घटना वारंवार घडत असल्याने ऊस गाळपात व्यत्यय सुरू आहे. शनिवारपर्यंत डाॅ. तनपुरे कारखान्यात ५ हजार ३०० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे.

पहिल्या टप्प्यात कारखान्याच्या तीन नंबर बाॅयलरमधून पुरेशी स्टीम मिळत नसल्याने उसाचे गाळप ठप्प झाले होते. हा बिघाड पंधरा दिवसांच्या प्रयत्नांनंतर दूर झाला. मात्र, चार दिवसांपूर्वी पुन्हा टर्बाइनमध्ये बिघाड झाल्याने साखर कारखान्यातील उसाचे गाळप थांबले गेले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment