अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! तर शून्य टक्के व्याजदर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून, चालु वर्षों आज अखेर अल्पमुदत शेतीकर्जा करिता ३२११ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पमुदत कर्ज वाटप करणारी आपली बँक एकमेव आहे.

दि.३१ मार्च २०२४ अखेर वसूलास पात्र कर्ज रक्कम कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत भरणा करुन ३ लाखापर्यंतच्या पिक कर्जास शुन्य टक्के व्याजदराचा फायदा घेण्याचे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

ते जिल्हा बँक आयोजीत जिल्ह्यातील वि.का. से. सोसायटीचे सचिव जिल्हा बँक शाखाधिकारी, वसूली अधिकारी यांच्या संयुक्त कर्ज वसूली आढावा बैठकीत अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह येथे बोलत होते.

महाराष्ट्र शासनाने पीक कर्ज वसूलीला स्थगिती दिली असली तरी शासनाने या कर्जाचे पूनर्गठण करुन देण्याबाबत सूचना केल्या आहेत. परंतु अशा प्रकारचे कर्जाचे पुनर्गठण केल्यास पुणर्गठण तारखेपासून या कर्जास ११% व्याजदर परवडणारा नसल्याने शेतकऱ्यांनी आपले कर्ज ३१ मार्च पुर्वीच भरुन शुन्य टक्क्याचा लाभ घ्यावा.

या मुदतीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना १० एप्रिलच्या आत पून्हा पीक कर्ज जिल्हा बँक देणार असल्याने याचा फायदा नियमित कर्जदार म्हणून शेतकऱ्यांनी घ्यावा असेही आवाहन कर्डिले यांनी केले.

ते पूढे म्हणाले की, जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्जफेड योजना राबवलेली असून, जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार कर्जदाराने या योजनेचा लाभ घेवून जिल्हा बँकेचे नियमित कर्जदार व्हावे. त्यामुळे अशा एक रकमी परतफेड कर्जदार लाभार्थी शेतकऱ्यांनाही जिल्हा बँक त्वरीत कर्ज पुरवठा करणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आर्थिक दृष्ट्या भक्कम पायावर उभी राहिलेली असून, देशातील एक सदृढ जिल्हा सहकारी बँक म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यातील ठेवीदारांनी जिल्ह्याच्या विकासाची कामधेनू असणाऱ्या जिल्हा बँकेत आपल्या ठेवी ठेवाव्यात. यासाठी जिल्हा बँकेकडून इतर बँकापेक्षा ठेवीवर आकर्षक व्याजदर दिले जात आहे.

या प्रसंगी संचालक प्रशांत गायकवाड हे म्हणाले, शासनाने नुकताच सहकार कायद्यात बदल करुन जिल्हा केडरला पून्हा पूर्नजिवीत केलेले आहे. या प्रसंगी खासदार सुजय विखे पाटील, बँकेचे जेष्ठ संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, बँकेच्या संचालिका श्रीमती गितांजली शेळके,

संचालक अमोल राळेभात, सरव्यवस्थापक जयंत देशमुख, मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी, तालुका विकास अधिकारी, जिल्ह्यातील शाखाधिकारी, वसुली अधिकारी, इन्सपेक्टर, वि.का. सोसायटीचे सचिव उपस्थित होते. सरव्यवस्थापक एन. के. पाटील यांनी आभार मानले.