नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले.
नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या माळीवाडा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. नगरकरांनी मला संधी दिली.
नगरकरांनी दिलेल्या या संधीमुळेच पाच वर्षांत शहरातील उपनगरांमध्ये चांगल्या पध्दतीचे काम करू शकलो. नगर शहर उपनगरात अनेक विकासकामातून एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
त्याच माध्यमातून तरुण पिढीला आयटी पार्कच्या माध्यमातून पाच वर्षांत ४०० ते ५५० तरुणांना नोकरी देण्याचे काम केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. या वेळी प्रा. अरविंद शिंदे, माजी उपमहापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक अविनाश घुले, निखिल वारे, उबेद शेख, राधेश्याम शर्मा आदींची भाषणे झाली.
- बजाजने लॉन्च केली पल्सर NS400Z! करू शकतात 5 हजार रुपयांमध्ये बुकिंग, वाचा या बाईकची किंमत आणि फीचर्स
- महाराष्ट्रात आजपासून वादळी पावसाचा कहर सुरु होणार ! पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज, कुठं-कुठं पूर्वमोसमी पाऊस पडणार ? वाचा….
- Shani Jayanti 2024 : शनि जयंती दिवशी करा ‘हे’ उपाय, जीवनातील सर्व अडचणी होतील दूर…
- Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये ‘वंचित’च्या उमेदवाराच्या कारवर हल्ला ! दगडे आली..पावडर तोंडात उडाली..काचा भर्रकन उडाल्या..’असा’ घडला थरार..
- Lakshmi Narayan Rajyog : ‘या’ राशीच्या लोकांचे उजळेल भाग्य, मिळेल अफाट संपत्ती आणि यश…