Animal Care : अरे वा ! गाई-म्हशींना लंपी सारख्या महाभयंकर आजारापासून वाचवणार ‘हे’ खास डिवाइस, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Animal Care : लंपी आजाराने (Lumpy Skin Disease) संपूर्ण भारत वर्षात कहर माजवला आहे. या आजारामुळे देशभरात आत्तापर्यंत हजारो पशु (Animal) दगावले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये लम्पी व्हायरसचा (Lumpy Virus) कहर दिसून आला आहे.

दरम्यान या सर्व राज्यांमध्ये एक कोटीहून अधिक लस जनावरांना देण्यात आली आहे. लसीने प्राणी पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु ते बर्याच प्रमाणात संरक्षणासाठी उपयुक्त आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने या आजाराने दगावलेल्या पशूंना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता पशुपालक शेतकऱ्यांना (Livestock Farmer) दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. आता असं एक तंत्र (Farming Technology) विकसित करण्यात आले आहे, ज्यावरून प्राण्याने किती वेळ खाल्ले, केव्हा चर्वण केले, प्राण्याला क्रियाकलाप आहेत का इत्यादी माहिती मिळू शकेल.

यासह, जनावर आजारी असल्यास देखील पशुपालक शेतकऱ्याला (Farmer) सूचित केले जाईल. यामुळे पशुपालक शेतकरी बांधवांना प्राण्यावर वेळेत उपचार करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय शेतीच्या कामातही हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे.

जिओ गौ समृद्धी उपकरण विकसित झालं 

रिलायन्स जिओने ‘जिओ गौ समृद्धी’ नावाने असेच एक 5जी कनेक्टेड उपकरण विकसित केले आहे. 5 वर्षे काम करणारे हे 4 इंची उपकरण प्राण्याच्या गळ्यात घंटा सारखे बांधले जाणार आहे. उर्वरित काम ‘जिओ गौ समृद्धी’ करणार आहे.  देशात सुमारे 30 कोटी दुभती जनावरे आहेत. अशा परिस्थितीत, केवळ 5G स्पीड आणि कमी लेटन्सीद्वारे एकाच वेळी अनेक प्राण्यांवर लक्ष ठेवता येणार आहे.

यंत्र प्राण्याची हालचाल ओळखेल

हे उपकरण प्राण्याची हालचाल ओळखेल. प्राण्याने अन्न कधी खाल्ले, पाणी कधी प्यायले, किती वेळ चर्वण केले इ. ही सर्व माहिती शोधत राहील. तसे, प्रत्येक पशु पालकाला माहित आहे की प्राणी आजारी पडण्यापूर्वी, तो चघळणे कमी करतो किंवा थांबवतो. मात्र आता प्राणी चावणे कमी किंवा थांबवताच हे उपकरण पशुपालक शेतकरी बांधवांना अलर्ट जारी करेल. प्राण्याच्या गर्भधारणेची नेमकी वेळही हे उपकरण सांगेल. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या 5G तंत्रज्ञानाला कामधेनू म्हटले आहे.

मातीचे आरोग्यही सांगेल

याशिवाय अजून एक यंत्र जिओने विकसित केल आहे. शेती आणि मातीच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम करण्यासाठी Jio-Krishi 5G यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र किती पाऊस पडला, जमिनीत आणि वातावरणात किती ओलावा आहे, अति उष्मा आणि दंव याची माहिती योग्य वेळी शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्याचे काम करणार आहे. कोणत्या विशिष्ट हंगामात कोणते कीटक पिकावर हल्ला करू शकतात, याचीही सूचना हे उपकरण देणार असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

जिथे अळी लागली आहे तिथेच ड्रोन फवारणी करेल

याशिवाय जिओने असे ड्रोन सोल्यूशन्स तयार केले आहेत जे 5जी कनेक्टेड आहेत. हा ड्रोन जिओ कृषी उपकरणातील डेटा गोळा करेल आणि पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होण्यापूर्वीच औषध फवारणी करेल. हा ड्रोन इतका स्मार्ट असेल की फवारणी फक्त त्याच ठिकाणी करेल ज्या ठिकाणी कीटकांचा अधिक प्रादुर्भाव असेल.