Government Schemes : ‘ह्या’ 3 सरकारी योजना आहे सर्वात बेस्ट ! तुम्हाला होणार बंपर फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Schemes : सध्या देशात केंद्र आणि राज्य सरकार लोकांचा आर्थिक हित लक्षात घेत अनेक योजना राबवत आहे. असेच काही योजना सरकार कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी राबवत आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना बंपर नफा मिळतो.

आम्ही तुम्हाला सांगतो आज देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लोक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहे. हेच त्यांचे उत्पन्नाचे साधनही आहे. यामुळे देशभरात शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने काही विशेष योजना सुरू केल्या आहेत. आम्ही तुम्हाला अशा 3 योजनांबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला मोठा फायदा देखील होणार आहे.

पीएम कुसुम योजना

केंद्र सरकारची ही अतिशय खास योजना आहे, जी शेतीसाठी चालवली जाते. पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंपावर 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. सिंचनाची समस्या संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली आहे. सोलर पंप प्लँट उभारण्यासाठी खर्चाच्या 30 टक्के कर्जही उपलब्ध आहे. शेतकऱ्यांशिवाय पंचायती आणि सहकारी संस्थांनाही सवलतीच्या दरात पंप उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

भाजीपाला पिकांची उत्पादकता वाढावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ही योजना हजारो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना फळझाडे, भाजीपाला आणि औषधी लागवडीसाठी प्रशिक्षण, कर्ज व अनुदान दिले जाते.

राष्ट्रीय पशुधन अभियान

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. यासह मत्स्यपालन, पशुपालन, कुक्कुटपालन किंवा एकात्मिक शेतीच्या मॉडेलमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला जातो. या योजनेंतर्गत कुक्कुटपालन फार्मसह शेळ्या, मेंढ्या आणि डुकरांसाठी आवार बांधणे आणि चाऱ्यासाठी 50 टक्के अनुदानाची तरतूद आहे.

हे पण वाचा :- Earn Money : सरकारच्या मदतीने सुरू करा ‘या’ फुलाची लागवड ! होणार लाखोंची कमाई ; जाणून घ्या सर्वकाही