Sarkari Yojana Information : PM Kisan योजनेअंतर्गत येणाऱ्या समस्यांवर उपाय करणे अधिक सोप्पे, फक्त मदतीसाठी या नंबरवर कॉल करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sarkari Yojana Information : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojna) ही केंद्र सरकारची (Central Government) अशी योजना आहे, ज्यातून गरीब शेतकऱ्याला वार्षिक ६००० रुपये दिले जातात. तसेच देशातील करोडो शेतकरी (Farmer) या योजनेचा लाभ घेत आहेत.

हे ६००० रुपये पात्र शेतकरी कुटुंबासाठी आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले अशी आहे. यासाठी, सरकार एका वर्षात योजनेअंतर्गत २०००-२००० रुपयांचे ३ हप्ते पाठवते.

लाभार्थ्यांसाठी EKYC अनिवार्य

सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी eKYC अनिवार्य केले आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता ३१ मे पर्यंत eKYC अपडेट करणे आवश्यक आहे. यापूर्वी, eKYC साठी ३१ मार्च २०२२ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती, परंतु सरकारने ती ३१ मे २०२२ पर्यंत वाढवली आहे.

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर असे लिहिले आहे की, ‘पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी EKYC अनिवार्य आहे. कृपया, बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. OTP प्रमाणीकरणाद्वारे आधार आधारित eKYC तात्पुरते थांबवण्यात आले आहे.’

वेबसाइट वाचते, ‘सर्व PM किसान लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत ३१ मे २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.’ अशा परिस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचे eKYC लवकर अपडेट करून घ्यावे जेणेकरून योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

हेल्पलाइन क्रमांक (Helpline number)

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेशी संबंधित हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. एखाद्या व्यक्तीला योजनेशी संबंधित काही समस्या असल्यास, तो हेल्पलाइन नंबरवर कॉल करून समस्या सांगू शकतो आणि त्यांचे निराकरण करू शकतो किंवा त्यांच्या निराकरणाच्या प्रक्रियेबद्दल माहिती घेऊ शकतो. हा क्रमांक ०११-२४३००६०६ आहे.