Baal Aadhaar : तब्बल 16 कोटी बालगोपाळांना मिळाले हक्काचे ओळखपत्र, जाणून घ्या योजनेबाबत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Baal Aadhaar : देशातील तब्बल 16 कोटी बालकांना आधार कार्ड (Aadhar Card) मिळाली आहे. यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळाले आहे. मुलांना आधार कार्डशी जोडणारा हा प्रकल्प (Project) यशस्वी झाला आहे.

त्याचे रुपांतर आता राष्ट्रीय योजनेत (National Scheme) केले जाणार आहे. त्याचबरोबर बाल आधार योजना राष्ट्रीय होणार आहे. आता या योजनेला व्यापक (comprehensive) स्वरुप दिले जात आहे.

UIDAI ला रजिस्ट्रार करार करायचा आहे, जे नावनोंदणी एजंट (Agent) होऊ शकतात. यासह, जन्म प्रमाणपत्र (birth certificate) दिल्यानंतर आधार क्रमांक प्रदान केला जाईल. या आधार कार्डातील माहिती वयाच्या पाच वर्षानंतर अपडेट केली जाईल.

यासाठी एक पायलट प्रोजेक्ट उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला होता आणि तो यशस्वी होताना दिसत होता. या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “याचा फायदा असा आहे की मुलांना जन्मतःच एक वेगळी ओळख मिळेल.

ज्यामुळे त्यांना प्रीस्कूल स्तरावर मिळणाऱ्या लाभांमध्ये प्रवेश करणे सोपे होईल. यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. तसेच, मूल पाच वर्षांचे झाल्यावर, डुप्लिकेशन होणार नाही याची खात्री करण्यासाठी आधारची पुन्हा पडताळणी केली जाईल.

अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी योजनांशी जोडलेले सुमारे आठ कोटी आधार-संबंधित व्यवहार दररोज केले जातात. सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांसाठी आधार आवश्यक आहे.

अहवालानुसार, जूनमध्ये एक वाद निर्माण झाला जेव्हा असे म्हटले होते की आधार नसलेल्या मुलांना पोषण योजनेअंतर्गत शाळांमध्ये गरम शिजवलेले जेवण मिळू शकत नाही.