मोठी बातमी! ‘या’ 14 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटवले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. आता याच पार्शवभूमीवर एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारने राज्यात लागू असलेले कोरोनासंदर्भात काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून येत्या 4 मार्चपासून नव्याने करण्यात आलेले बदल लागू होतील.

कोरोनाची स्थिती सुधारत असलेल्या जिल्ह्यांचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला असून राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे आहेत ते 14 जिल्हे :- मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

कोणते निर्बंध शिथिल होणार? :- शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क 100 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी सामाजिक,

क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा उत्सवाशी संबंधित कार्यक्रम संबंधित हॉल किंवा मैदानाच्या 50 टक्के क्षमतेनं घेण्यास परवानगी राज्यातील सरकारी आणि खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीची परवानगी शाळा पूर्ण क्षमतेने आणि पूर्णवेळ सुरु करण्यास परवानगी लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले

कोणत्या निकषांवर निर्बंध शिथिल? :- लसीचा पहिला डोस झालेल्या नागरिकांचं प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी हवा

महत्वाच्या सूचना:-  निर्बंध शिथिल करतानाच राज्य सरकारने संपूर्ण लसीकरणाची अट ठेवली आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे, मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, पर्यटन, रेस्टॉरंट, क्रीडा मैदाने, होम डिलीव्हरी करणारे या सर्वांना लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असणार आहे.