कोरोना काळातील कॅगचा अहवाल आला, अजितदादांबद्दल म्हटले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

corona news :विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. बहुतांश वेळा हा अहवाल सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणारा असतो.

कोरोना काळातील राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दलचा हा अहवाल आहे. या काळात अजितदादा पवार हे वित्तमंत्री होते. विशेष म्हणजे या अहवालात अजितदादांचे कौतूक करण्यात आले आहे.

कोरोना काळात राज्याचा जीडीपी घटला असला तरी राज्याची राजकोषीय तूट कमी करण्यात राज्य सरकारला यश आल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

२०२१-२०२२ मध्ये राजकोषीय तूट ३ टक्क्यांच्या खाली आणण्यात राज्य सरकारला यश आले असून यामध्ये अजित पवार यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

राज्यातील खर्चाचा लेखाजोखा मांडणाऱ्या कॅगच्या अहवालातून अनेक मुद्दे समोर आले आहेत. २०१६-२०१७ साली राज्यावरचं कर्ज ४ लाख कोटी होते, ते सध्या ५ लाख ४८ हजार १७६ कोटींवर गेले आहे.

तर कोरोना काळात राज्याचा जीडीपी ३ टक्क्यांनी घटला असल्याचेही अहवालात म्हटले आहे. कृषी क्षेत्रात १३ टक्क्यांची वाढ झालेली आहे. जीएसटीमध्ये १५.३२ टक्के तर व्हॅटमध्ये १२.२४ टक्के घट झालेली आहे.