राज्यपाल झाले सक्रीय, सरकारकडून मागविला हा तपशील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Politics : कोरोनातून बरे होऊ राजभवनावर परतलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा सक्रीय झाले आहेत. आमदार प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र पाठविले आहे.

राजकीय अस्थिरतेच्या काळात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती राजभवनातून मागविण्यात आली आहे.राजभवन सचिवालयाने राज्य सरकारला २२ ते २४ जून या काळात मंजूर केलेल्या फायली आणि प्रस्तावांचा तपशील देण्यास सांगितले आहे.

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक फायली व जीआर सरकारकडून घाईघाईत मंजूर करण्यात आल्याच्या आरोप दरेकर यांनी केला होता. यामध्ये राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर राजभवनातून हे निर्देश देण्यात आले आहेत.