सरकार चालवण्याची यांची लायकी नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी (ST staff) राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) या निवासस्थानाबाहेर केलेल्या हिंसाचार प्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली होती.

सदावर्ते यांच्यावर मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणेसह आणखीन ३ जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे सदावर्ते यांना त्या त्या जिल्ह्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर तब्बल १८ दिवसांनंतर त्यांची जामिनावर सुटका केली आहे.

तसेच या प्रकरणात अ‍ॅड. जयश्री पाटील (Adv. Jayashree Patil) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) सोमवारी दिलासा देत २९ एप्रिलपर्यंत अटकेपासून हंगामी संरक्षण दिले होते.

यादरम्यान जयश्री पाटील सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) टीका करताना सरकार हार पचवू शकले नाहीत म्हणून मला, पतीला फसवण्यात आलं असा आरोप त्यांनी केला आहे.

यासोबतच जयश्री पाटील म्हणाल्या, राज्य शासनाने केलेल्या या कारवाईमुळे आत्ता आमच्यात हत्तीचं बळ आलं आहे. जोर जबरदस्तीचा काही परिणाम होणार नाही, दोन दिवस सर्च केला, सगळं घर सर्च केलं, सगळं कष्टाच्या पैशातून आम्ही हे घेतलं आहे. ते काही लवासाच्या पैशातून घेतलं नाही, असे म्हणत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

त्याचबरोबर हे सरकार नापास सरकार आहे. सरकार चालवण्याची यांची लायकी नसल्याचे म्हणत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी असं आमचं ठाम मत असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

तर आपल्या पतीच्या नावातच गुणरत्त आहे. ते गुणी आहेत. त्यामुळे या सरकारला वार्निंग आहे की हे असे प्रकार करू नका. मी स्वातंत्रवीर लक्ष्मणराव पाटलांची कन्या आहे. आम्ही न्यायिक मार्गाने लढू. तर आमच्यासाठी वकिलांची फौज असल्याचेही जयश्री पाटील म्हणाल्या आहेत.