IMD Alert : मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार, मात्र उष्णता कायम, जाणून घ्या हवामानाची स्थिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : यंदा मान्सून (Monsoon) वेळेआधीच केरळमध्ये (Kerala) दाखल होणार असल्याचे आयएमडीने (IMD) सांगितले आहे. मात्र, शुक्रवारपासून राजधानी दिल्लीसह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा (heat wave) इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये शुक्रवारपासून तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

राजधानी दिल्लीमध्ये (capital Delhi) काल काही ठिकाणी तापमान (Temperature) ४४ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र, पूर्वेकडील वाऱ्यामुळे उष्ण आणि पश्चिमेकडील हवेत घट झाली आहे. गुरुवारी दिल्लीच्या काही भागात उष्णतेची लाट आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच, पूर्वेकडील वाऱ्यामुळे उष्ण व कोरड्या पश्चिम हवेत दाबाची स्थिती दिसून येत आहे. मात्र, सफदरजंग शालामध्ये कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्याचवेळी नजफगढ, मुंगेशपूर आणि पीतमपुरा येथेही तापमान सामान्यपेक्षा ५ अंशांनी जास्त नोंदवले गेले आहे.

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आयएमडीने दिल्लीसह राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. वास्तविक, या दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

त्याचबरोबर उष्णतेच्या लाटेपासून सावध राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तापमान ४६ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असे आयएमडीचे म्हणणे आहे.

तसेच गुजरात आणि सौराष्ट्रातील अनेक भागात शुक्रवारपासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी, १६ मे पर्यंत देशातील १० राज्यांमध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर मंगळवारनंतर राजधानी दिल्लीसह इतर राज्यांमध्ये हवामान बदललेले दिसेल. यासोबतच वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे हवामानातील बदलासह तापमानातही घट होणार आहे.

नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्राला लागून असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागरात १५ मेपर्यंत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. खरं तर, यंदा मान्सून १५ मेपर्यंत बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.

त्यामुळे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रासह गोव्यात काही ठिकाणी हलका रिमझिम पाऊस पडेल. मात्र, महाराष्ट्र आणि गोव्यातही तापमानात एक ते दोन टक्क्यांची वाढ नोंदवली जाऊ शकते. येथे आसनी चक्रीवादळ कमकुवत झाल्यामुळे आंध्र आणि ओरिसाच्या काही भागात हलका रिमझिम पाऊस पडू शकतो.