राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होणार नगरपालिका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  नगर तालुक्यातील नगरपालिकेच्या निकषात बसणाऱ्या नागरदेवळे, वडारवाडी, केतकी- शहापूर या तीन ग्रामपंचायती मिळुन लवकरच नगरपालिका होणार आहे.

या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली . नगर तालुक्यातील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की, बऱ्यापैकी शहरीकरण झालेले असतानाही नागरदेवळे, वडारवाडी, केतकी – शहापूर या भागांचा विकास झाला नाही.

ग्रामपंचायत असल्याने येथे विकासात्मक योजना राबविण्यात मर्यादा येतात. यामुळे या तिनही ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठवण्यात आलायेता. लवकरच यावर अंतिम निर्णय होईल.

शासनस्तरावरून माहिती संकलीत करण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना सातत्याने अडचणीत येत असल्याने या योजनांचे धोरण बदलणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असुन लवकरच यात धोरणात्मक बदल होणार आहेत.

पिंपळगाव माळवीतलाव परिसरातील जेऊर, डोंगरगण, मांजरसुंभा, धनगरवाडी व इतर गावातील पाणी योजना आता सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहे. त्या योजना आता महावितरणला जोडणार असुन त्यासाठी ६० लाखांचा खर्च येणार आहे.

यामुळे योजना स्वयंपुर्ण होतील ग्रामपंचायतीना आर्थिक उत्पन्न ही मिळु शकेल. जिल्ह्यात वीज उपकेद्रांची निर्मिती करण्यात आली असुन त्यात नगर तालुक्यातील डोंगराचा समावेश आहे. नगर तालुक्यात आता विकासाचे राजकारण करणार असून

तालुक्यातील बाजार समिती, पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मागे भक्कम पणे उभा राहणार असुन आगामी सर्व निवडणुका पुर्ण ताकतीने लढवणार असल्याचे राज्य मंत्री तनपुरे यांनी सांगितले.