“अशी कृती कारवाईला पात्र, त्यानुसार कारवाई करू”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी कट्टर हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच मुद्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी कमिटी निर्णय घेईल असे उत्तर दिले.

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानांतर त्यांना जीवे मारण्याचे धमकी वजा फोन येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार (Central Goverment)  झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) देणार असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत पत्रकारांनी दिलीप वळसे पाटलांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, त्यांना मुंबई पोलीस सुरक्षा (Mumbai Police Security) वाढणार का किंवा कोणती सुरक्षा द्यायची याचा निर्णय कमिटी घेईल. आम्ही राज्यात कायदा, सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्ण तयारी केली आहे असे वळसे पाटील म्हणाले आहेत.

पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, कुठल्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजा-समाजात तेढ आणि अशांतता निर्माण होत असेल, तर अशी कृती कारवाईला पात्र ठरते. त्यानुसार कारवाई करू.

सगळ्या देशात एकप्रकारे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रातही अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु त्याची महाराष्ट्र पोलिसांनी पूर्ण तयारी केलीय.

महाराष्ट्रात अशांततेचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घेतोय. रमजानच्या महिन्यात दंग्याचे इनपुट नाही. आज राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावलीय.

उद्या सगळ्यांची बोलू. आयबी, रॉ, काय म्हणतातयत ते पाहू. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवू. योग्य ती पावले उचलू. त्यासाठी कॅबिनेटमध्ये जायची गरज नाही असेही ते म्हणाले आहेत.

अमरावती, अचलपूर या विशिष्ट परिसरात हिंसक घटना घडतात. याचा अर्थ तिथे काही घटक जास्त अॅक्टिव्ह आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. डीजी आज मिटिंग घेणार आहेत. त्यांचा रिपोर्ट येईल. त्यावर निर्णय घेऊ.

आपल्या देशात वेगवेळ्या प्रश्नावरून वातावरण तापवायचा प्रयत्न सुरूय. खरे तर भाजप आणि केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारी, सीमा सुरक्षा यावर चर्चा करावी.

मात्र, गोष्टींवरचे लक्ष अन्यत्र वळण्यासाठी असे प्रश्न निर्माण केले जातायत. अशांततात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. काही लोक सहभागी होत आहेत असे आरोपही दिलीप वळसे पाटील यांनी केले आहेत.