अहमदनगर :- ज्या लोकांनी खासदार दिलीप गांधींवर दबाव आणून नगरचे विमानतळ पळवून नेले. ते दक्षिण मतदारसंघाचा विकास काय करणार?
या तालुक्यात विमानतळ झाले असते, तर मोठा विकास झाला असता. त्यांनी विमानतळ उत्तरेत पळवले.
पण स्वतःचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागोजागी हेलिपॅड तयार केले, असा टीकेचा टोला राष्ट्रावादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी मारला.
जेऊर बायजाबाई येथे पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अयोजित करण्यात आली होती.
आमदार जगताप यांनी बायजामातेचे दर्शन घेऊन आठवडी बाजारात भाजीपाला आणि फळविक्रेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
आमदार जगताप आपल्या भाषणात म्हणाले, मी विधानसभेत शहराचे प्रतिनिधित्व करतो.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरून सभागृहात आवाज उठवल्याने मला एक वर्षासाठी निलंबित केले होते. विरोधी पक्षनेते कितीवेळा निलंबित झाले ते त्यांनी सांगावे.
मी शहरात रहात असलो, तरी माझी नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आहे. बाहेरचे लोक इथे येतील, गोड गोड बोलून मोठी स्वप्ने दाखवतील.
विकासाच्या केवळ वल्गना करून जनतेला स्वप्ने दाखवणारे २३ मार्चनंतर गायब होतील. पण मी कुठेही जाणार नसून कायम तुम्हाला भेटणारा आहे.
- Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मजाच मजा, ‘या’ बँका एक लाखाच्या गुंतवणुकीवर देत जबरदस्त परतावा, बघा व्याजदर…
- PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १५० पदांसाठी भरती सुरु, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!
- भारतीय कार बाजारात टोयोटाच्या ‘या’ लोकप्रिय SUV कारचे नवीन वॅरीयंट लाँच ! किंमत अन फिचर्स कसे आहेत ? वाचा सविस्तर
- BMC Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती, वाचा सविस्तर…
- Maharashtra Politics : फडणवीसांना जेलमध्ये टाकायचे, भाजपचे २५ आमदार फोडायचे.. एकनाथ शिंदेंनी आज सांगून टाकला प्लॅनिंग