Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि दुपटीने परतावा मिळवा! वाचा योजनेची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रत्येक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याअगोदर मिळणारा परतावा आणि मिळणारा व्याजदर याचा प्रकर्षाने विचार करूनच गुंतवणूक करत असतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण केलेली गुंतवणुकीची सुरक्षितता या गोष्टीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते

या दोन्ही गोष्टी पाहूनच प्रत्येक गुंतवणूकदार गुंतवणूक योजनांची किंवा पर्यायांची निवड करत असतात. गुंतवणुकीसाठी पाहिले तर आपल्याला अनेक सरकारी योजना आणि बँकांच्या मुदत ठेव योजना यांना प्राधान्य देण्यात येते अशी स्थिती आहे.

याव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक योजना आहेत ज्या गुंतवणुकीसाठी खूपच फायद्याच्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या अनुषंगाने पाहिले तर पोस्ट ऑफिसची एक योजना गुंतवणुकीसाठी खूप फायद्याचे असून जर तुम्हाला पैसे डबल करायचे असतील

तर ही योजना खूप महत्त्वाची सिद्ध होऊ शकते. पोस्ट ऑफिसची ही योजना किसान विकास पत्र योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेचे स्वरूप आपण थोडक्यात या लेखात बघू.

 गुंतवणुकीसाठी पोस्टाची किसान विकास पत्र योजना आहे फायद्याची

 पोस्ट खात्याची किंवा पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही एक सरकारी योजना असून तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला हमीभावाने पैसे दुप्पट करता येऊ शकतात. या योजनेचे स्वरूप पाहिले तर किमान एक हजार रुपये गुंतवून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात करू शकतात.

तसेच कमाल गुंतवणुकीला यामध्ये कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. साधारणपणे पाहिले तर तुम्ही 1000, 5000, दहा हजार आणि 50 हजार रुपया पर्यंतची प्रमाणपत्र यामध्ये खरेदी करून पैशांची गुंतवणूक करू शकतात.

ही एक दीर्घ कालावधीची गुंतवणूक योजना असून यामध्ये तुम्हाला एकदा पैसे भरावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला सुमारे दहा वर्षानंतर दुप्पट परतावा मिळतो. किसान विकास पत्र योजनेमध्ये दर तिमाही आधारावर व्याजदरामध्ये सुधारणा केली जाते

म्हणजेच व्याजदर हा तर तीन महिन्यांनी निश्चित केला जातो. सध्या आपण किसान विकास पत्र या योजनेवर मिळणाऱ्या व्याजदराचा विचार केला तर तो 7.5% इतक्या दराने मिळत आहे. समजा यामध्ये तुम्ही

जर आज अडीच लाख रुपये जमा केले तर दहा वर्षानंतर तुम्हाला या माध्यमातून दुप्पट परतावा मिळू शकतो. अशा पद्धतीने किसान विकास पत्र ही योजना गुंतवणुकीसाठी महत्त्वाची आणि सुरक्षित असून या योजनेच्या अधिकच्या माहितीसाठी तुम्ही तुमच्या नजिकच्या  पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता.