Bhagatsingh Koshari : पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंग कोशारींचा खळबळजनक खुलासा, म्हणाले अजित पवार माझ्याकडे आले आणि….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhagatsingh Koshari : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा खुलासा केला आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा.

तसेच त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखवले. मग शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. असा खळबळजनक दावा कोशारी यांनी केला आहे. सध्या पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

दरम्यान पुढे कोर्टात आव्हान दिल्यावर त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. राज्यपाल कधीही स्वतःहून शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात, तेच बोलवतात. मी ज्यांना शपथ दिली, त्यांनी याबद्दलचे सत्य सांगितले आहे, असेही कोशारी यांनी म्हटले आहे.

तसेच सकाळी 8 वाजता झालेला शपथविधी त्याला सगळे पहाटेचा शपथविधी म्हणतात. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यांनी मला वेळ मागितला, मग मी त्यांना वेळ दिला. काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. ते म्हणाले की वेळ दिली तर आमदारांचा घोडेबाजार होईल. मग मी बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी कमी केला, असेही ते म्हणाले.

यात सगळ्यात माझी भूमिका संदिग्ध कशी काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेली एक महत्त्वाची घटना ठरली आहे. याबाबत सध्या अनेक खुलासे केले जात आहेत.