गद्दार म्हणा, टींगल करा, आम्ही कामातून उत्तर देऊ; बच्चू कडूंचं वक्तव्य

मुंबई : राज्यात शिवसेना सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांना गद्दार म्हंटलं गेलं. यावरुन आता प्रहार संघटनेते प्रमुख बच्चू कडू यांनी उत्तर दिले आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांना न्याय देण्यासाठी लोकांनी मला … Read more

शिंदे मराठी माणसाच्या एकजूट फोडीचा नजराणा घेऊन गेलेत; दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील या दोन्ही गटामध्ये वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन शिवसेनेने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली … Read more

एकनाथ शिंदे ‘त्या’ दिवशी तासभर रडले; बंडखोर आमदाराने केला खुलासा

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगितले आहे. बंडखोरीचे कारण शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना या निवडणुकांमधून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून एकनाथ शिंदेंसोबत जो प्रकार सुरु होता, त्यामुळे त्यांचा संताप झाला … Read more

त्यांना आता ४० भोंगे मिळाले आहेत म्हणून…; राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील बहुतांश शिवसैनिक हे शिंदे गटामध्ये जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील मोठा वाद सुरु आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला काही धक्का बसलेला नाही. येथून गेलेले … Read more

माझे सरकारला आव्हान आहे हिंमत असेल तर….; वसंत मोरेंचे थेट आव्हान

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार, एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महाविकास आघाडीच्या निर्णयांमध्ये शिंदे सरकार बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या विषयावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला थेट आव्हान दिले … Read more

धनुष्यबाण शिवसेनेच्या हातून जाण्याची शक्यता; संजय राऊत म्हणतात, ‘जब खोने के लिए….’

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये मोठा वाद सुरु आहे. शिंदे गटाने दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता शिवसेनेतच राहून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. मात्र आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ठाकरे गटाच्या हातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची … Read more

सरकार बदललं आता तरी तक्रारी मागे घेणार का? किरीट सोमय्या म्हणले…

मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर आरोपांचा सपाटा लावणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सरकार बदलल्यानंतर काय भूमिका घेतली आहे. याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. सरकार बदललं असलं तरीही मी माझ्या तक्रारी मागे घेणार नाही. मंत्री असले तरीही अनिल परब यांचे … Read more

“आम्हाला बोलवायचे असेल तर भाजपलाही बोलवावं लागेल”

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपद घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले पण ३ पक्ष एकत्र म्हणजे अंतर्गत धूसपूस तर होणारच. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. राज्याच्या राजकारणाची नवी समीकरणं तयार झाली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी … Read more

‘मातोश्री’वरुन बोलवणे आले तर जाऊ पण…; बंडखोर आमदाराची अट

शिर्डी  :  शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरीनंतर आता ‘मातोश्री’वर जाण्याबाबत मौन सोडले आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी ‘मातोश्री’वरुन फोन आला तर जाऊ, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी देखील असे वक्तव्य केले आहे. आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला ‘मातोश्री’वर बोलवावे, असे सुहास कांदे … Read more

…म्हणून शिवसेनेने भावना गवळी यांची प्रतोद पदावरुन केली उचलबांगडी

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राज्याच्या विधीमंडळाला देखील मोठा धोका बसला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका उचलून धरली होती. त्यानंतर … Read more

एकनाथ शिंदेंना फडणवीस वेशांतर करुन भेटायचे; मिसेस फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत अमृता फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अमृता फडणवीसांनी दिलेल्या माहितीवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून एकनाथ शिंदेना भेटायला जायचे, असा गौप्यस्फोट अमृता फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. जॅकेट वगैरे घालून ते घराबाहेर … Read more

संजय राऊतांमुळे शिवसेना फुटली; शंभूराजे देसाईंचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांमुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. संजय राऊतांमुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार सेनेतून बाहेर पडले. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असे म्हणत शंभूराजे देसाईंनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांमुळेच शिवसेना … Read more

शरद पवारांशी कोणतीही भेट झाली नाही; एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो जुना असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. माझी आणि शरद पवारांची नुकतीच कोणतीही भेट झालेली नाही. प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेला फोटो जुन्या भेटीचे आहेत, असेही स्पष्टीकरण … Read more

शिंदेंची हौस तात्पुरती भागली; शिवसेनेचा खोचक टोला

मुंबई : अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडी सरकार पाडून  शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. त्यावरु शिवसेनेमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये नव्या सरकारवर टीका केली आहे.   भाजपाचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रिपद हवं होतं, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे … Read more

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला; मुखमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावरुन टीका केली. खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेवर नाराज असलेल्या आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला होता. अनेक बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबाबत अनेक तक्रारी देखील केल्या. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात भाजपसोबत युती करत शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यात विशेष अधिवेशन सुरु असताना सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी … Read more

आज फडणवीसांनी त्यांचा माईक हिसकावला उद्या….; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई : सोमवारी एका पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरुन माईक घेऊन स्वत: उत्तर दिले होते. शिवसेनेमधील नाराजी चव्हाट्यावर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या बैठकींचा सपाटा लावण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी केलेल्या कृत्यावरुन टीका केल्याचे पहायला … Read more

छत्रपती शिवरायांच्या ‘गनिमी काव्या’ने नवं सरकार; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

नागपूर : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार संभाळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या गनिमी काव्याप्रमाणे निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आले. सरकार बनवीन, पण सरकारमध्ये जाणार नाही, अशी घोषणा मी केली होती. घोषणा करुन मी घरी … Read more