नेवासे :- लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोणाला कोणत्या गावात किती मतदान झाले, हे प्रसिद्ध झाल्यावर राजकारण पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापू लागले आहे.
गडाख व मुरकुटे यांच्या गावांमध्ये विरोधी उमेदवारांना मताधिक्य मिळाल्यामुळे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मुरकुटेंच्या गावात काँग्रेसला लिड, मुरकुटेंनी लोखंडेंचे काम केलेच नाही अशा चर्चेमुळे मुरकुटे व भाजपची बदनामी झाल्याप्रकरणी नेवासे पोलिसात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.
आठ जणांच्या विरोधात तक्रार देण्यातआली आहे. भाजपचे नगरसेवक सचिन नागपुरे व तालुका उपाध्यक्ष दिलीप नगरे यांनी वेगवेगळ्या तक्रारी दिल्या आहेत.
तक्रारीत ईश्वर उगले व पांडुरंग होंडे यांनी ज्ञानेश्वर माउली ग्रुप, मोबाइल शॉपी ग्रुप, मराठ्यांचा राजकीय अखाडा, जय श्रीराम, भाऊसाहेब फोलाणे, दिव्य नेवासे या ग्रुपवर बदनामीकारक मजकूर केला असे नमूद केले आहे.
- पुणेकरांच्या सेवेत आणखी एक एक्सप्रेस ट्रेन ! कसा राहणार रूट, वेळापत्रक अन थांबे ?
- शेवगावात डॉ. सुजय विखे यांचा डंक्का प्रचार दौऱ्यातून साधला लोकांशी संवाद
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर…! लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पगार वाढणार, 8वा वेतन आयोगाची फाईल तयार
- माळशेज रेल्वे कृती समितीचा लंके यांना पाठींबा समितीच्या कार्यकारी मंडळाचे पाठींब्याचे पत्र
- पारनेर मधील जनता निलेश लंकेवर नाराज : राहुल शिंदे