पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला आहे.
अशातच अर्थव्यवस्था सुस्तावल्याची आकडेवारी दिवसागणिक उजेडात येत आहे. त्यातच बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेत मंदी येणे, हा एक नियमित प्रकार आहे. विशेषत: श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अर्थव्यवस्था मंदावत असते.
यात काहीही नावीन्य नाही. तरीही मंदीच्या मुद्यावरून विरोधकांद्वारे उगीचच अकांडतांडव करणे चुकीचे आहे. मंदीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना अमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. याकरिता ३२ सूत्री दिलासा पॅकेजची घोषणा केंद्राने केली आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
- अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटींनी घेतला हा मोठा निर्णय ! लोकसभेसाठी ‘ह्या’ उमेदवाराला पाठिंबा…
- नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! बजाज 3 मे ला लॉन्च करणार ‘ही’ नवीन टू व्हीलर
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युटीची किती रक्कम मिळते ?
- अहमदनगरसह महाराष्ट्रात योगी आदित्यनाथांच्या सभा का? पीएम मोदींचा प्रभाव कमी होतोय? की इतर राजकीय कारणे? पहा…
- DIAT Pune Bharti 2024 : पुण्यातील DIAT मध्ये पदवीधारक उमेदवारांना मिळणार नोकरी, जाणून घ्या अटी…