पती पत्नीला ट्रेनने चिरडले, सोळा वर्षांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
दिल्ली/ यमुना विहार – यमुना विहार कॉलनीत राहणाऱ्या नीरज कथुरिया आणि निशा कथुरिया यांच्या सोळा वर्षाच्या प्रेम कहाणीचा असा अंत होईल असं कोणालाही वाटलं नव्हत. 
रात्री जवळजवळ अकरा वाजता दोघांमध्ये घरातील वाढत्या खर्चावरून वादविवाद झाला वाद इतका वाढला की निशा आपलं सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर गेली. पत्नीची समजूत काढण्यासाठी पती सुद्धा आपल्या मित्राबरोबर तिच्यामागे रेल्वे स्टेशन वर पोहोचला. तिथं पण दोघांमध्ये खूप वादविवाद झाला.

जेव्हा या वादविवादातून कोणताही तोडगा निघत नाही असे दिसले तेव्हा दोघे एकमेकांना आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागले,

आणि दोघेही रेल्वे ट्रॅक वर जाऊन उभे राहीले. याच वेळी फिरोजपुर धनबाद एक्सप्रेस ट्रेन आली आणि तिने दोघांना जोरदार धडक दिली.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की जेव्हा रेल्वे आली तेव्हा पत्नी पतीला आणि पती-पत्नीला रेल्वे ट्रॅक वरून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र एवढ्या वेळात रेल्वे आली आणि दोघांनाही आपला जीव गमवावा लागला.

या घटनेची सूचना मिळताच जीआरपीने दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. बॅग मधुन मिळालेल्या पासपोर्ट आणि आधार कार्ड वरून दोघांची ओळख पटवली गेलीअसून पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टम साठी त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले आहेत. प्रेम विवाह झाल्यानंतर पाच महिन्यांतच परिवारापासून वेगळे झाले होते.

प्रेम नगर निवासी नीरज कथुरिया आणि आझाद नगर निवासी निशा हे जवळ जवळ 16 वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले तिथे दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. नीरज व्यवसायाने फोटोग्राफर असून निशा टिक टोक वर व्हिडिओ बनवत असे.

यानंतर जवळ जवळ पाच महिन्यांनी दोघेही आपल्या परिवारापासून वेगळ होत यमुना विहार येथे भाड्याच्या घरात राहत होते राहू लागले. या दांपत्याला दोन मुले असून मोठा मुलगा 14 वर्षांचा आहे तर छोटा मुलगा आठ वर्षांचा आहे.

Leave a Comment