लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांनी झालेल्या मारहाणीत आठ जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी २५ ते ३० जणांवर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दोन गटांतून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गुन्हा दाखल झाला.

यासंबंधी इंदिरानगर कोपरगाव येथील शमिना कलिम शेख हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आम्ही घरात जेवण करीत असता नाशिम शौकत पठाण, युनूस पाशू शेख, अफताब आयुब शेख, शौकत यासिम पठाण, आयुब पाशू शेख, रफिक पाशू शेख, जाफर आयुब शेख, फैजल आयुब शेख, शानू शौकतपठाण, तायरा युसूफ शेख, फरिदा आयुब शेख, सोमय्या रफिक शेख, बीबी शौकत पठाण, मुनती पाशू शेख (सर्व इंदिरानगर) यांनी आमच्या घरावर दगडफेक करीत मारहाण केली.

दुसऱ्या घटनेत युनूस पाशू शेख यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत कलिम अब्दुल शेख, शमीना कलिम शेख, नदिम कलिम शेख, कासिम कलिम शेख, सोनू कलिम शेख, अरबाज कलिम शेख, मुलांबी याकूब शेख, बशिरा याकुब शेख, सुलतान याकूब शेख, सना सुलतान शेख, याकूब शेख यांना मारहाण केली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment