आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्यांना वादळी पावसाचा फटका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नगर शहरासह तालुक्यातील बहुतांशी गावांना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला. गहू, मका, कांदा, घास या पिकांचे नुकसान झाले. संत्राबागा व कांद्याच्या पिकाला दुसऱ्यांदा वादळी पावसाचा फटका बसला.

बाजार समिती, आठवडे बाजार बंद असल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्यांना वादळी पावसाचा फटका बसला. सायंकाळी चारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. खडकी, बाबुर्डी, भोरवाडी, निमगाव वाघा येथील संत्राबागांचे मोठे नुकसान झाले.

संत्राफळे आता तयार होऊन काढणीला आली आहेत. मात्र, बाजार बंद असल्याने या फळांची काढणी शेतकऱ्यांनी काही दिवस लांबणीवर टाकली. पावसात फळे खाली पडली. बागेत फळांचा खच पडला होता.

कापूरवाडी, वारूळडी, जेऊर, डोंगरगण, धनगरवाडी, पिंपळगाव माळवी, ससेवाडी या भागातही गहू व मका पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. निंबळक, वडगावगुप्ता, हिंगणगाव येथेही गहू, मका व कांदा पिकाचे नुकसान झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment