मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले तरच कोरोनावर मात शक्य…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळावे. सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे अवाहन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांतील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा थोरात यांनी घेतला. अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी ही बैठक झाली.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलिस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील, पी. वाय. कादरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, लॉकडाऊनमुळे कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले आहे. मात्र, आता नागरिकांनी शासनाच्या नियमांसह स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.

धांदरफळ, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणच्या नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. आमदार तांबे म्हणाले, कोरोना संकटात अनेक शासकीय विभागांचे कर्मचारी सेवा देत आहेत.

या सर्वांच्या आरोग्य विम्याबाबत प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी. पावसाळयाच्या सुरुवातीला सर्दी, ताप, खोकल्याची साथ येऊ शकते. घाबरुन न जाता जवळच्या डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment