जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही, मात्र …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलेच पाय रोवले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा ६  हजारांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील वातावरण तापू लागले असल्याचे चित्र आहे. 

दोन दिवसापूर्वी विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खा. विखे यांनी प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य केले होते.

हाच धागा पकडत आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की,  ‘लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही, असे घडलेले नाही. खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही. मात्र, आमच्यात चांगला संवाद आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती देखील सुरु आहे. मात्र, डॉक्टरच मिळत नसल्याने अडचणी येत आहेत, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बाजू जाणून घेतली. ते म्हणाले, डॉ. विखे यांच्यात व आमच्यात चांगला संवाद आहे

काय म्हणाले होते खा. सुजय विखे- 

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापैकी चार कोटी रुपये नवीन कर्मचा-यांची भरती करण्यासाठी आहेत मात्र आतापर्यंत एकाही कर्मचा-यांची भरती नाही.

तसेच उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले होते.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment