महापौरांनी दिला या विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसापासून शहरासह जिल्ह्यत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहे.

या समस्येवर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या प्रश्नाबाबत महापौर आक्रमक झाले आहे. शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांवरील खड्ड्यांच्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नेप्ती नाका ते कल्याण महामार्ग रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. रस्‍ते खराब झालेले असून देखील आपण व आपल्या अखत्‍यारीतील अधिका-यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

‘ महामार्गांच्या दुरावस्थेप्रकरणी महापौर वाकळे यांनी आक्रमक भूमिका घेत अधीक्षक अभियंत्यांना पत्र धाडले आहे. शहरातून जाणा-या मनमाड ,पुणे, औरंगाबाद, सोलापूर , कल्याण महामार्गावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते.

सदर महामार्ग हे शहरातून जात असल्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. या चारही महामार्गावरील रस्‍ते अत्‍यंत खराब झालेले आहेत.

नागरिकांच्‍या जिवाशी खेळण्‍याचा प्रयत्‍न आपण करत आहात, असे म्हणत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

15 दिवसांच्या आतमध्ये या रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, तसेच कोणत्याही क्षणी काळे फासले जाईल, असा इशाराही वाकले यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment