मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कायम विकासाला प्राधान्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात विकास कामांचा वेग कायम असून कोरोना संकटातही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम गावच्या वाडी-वस्तीच्या विकासाला प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेच्या ३०५४ निधीतून चिकणी-निमगाव भोजापूर-राजापूर या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या ५० लाख रुपये निधीच्या कामाचा शुभारंभ इंद्रजित थोरात व जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, सुनील कडलग, भारत वर्पे, आनंद वर्पे, प्रकाश कडलग, दत्तात्रय गुंजाळ, संजय वर्पे, चंद्रभान वर्पे, संदीप वर्पे, संतोष कडलग यावेळी उपस्थित होते. इंद्रजीत थोरात म्हणाले, यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण आहे.

थोरात कारखान्याच्या मदतीने आढळाचे ओव्हरफ्लोचे पाणी चिकणीच्या रोहित ओढ्यात आणले आहे. यामुळे पाणी पातळी वाढणार आहे.

तर होणार्‍या रस्त्यांमुळे नागरिकांची सोय होणार आहे. कातोरे म्हणाले, मंत्री थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात रस्त्यांचे व विद्युतीकरणाचे जाळे विणले गेले आहे. रस्त्यांचे डांबरी व मजबुतीकारणास प्राधान्य दिले जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment