राहुरीत ऊस उत्पादक आक्रमक; केली ‘ही’ मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-यंदाच्या हंगामासाठी कारखान्यांचे गाळप सुरु होणार आहे. परंतु या पूर्वीच राहुरीत ऊस उत्पादक आक्रमक झाले आहेत. शेतकर्‍यांची एफआरपी थकविणार्‍या साईकृपा फेज 2 कारखान्यास ऊस गाळप परवाना देऊ नये,

अशी मागणी राहुरी तालुका शेतकरी संघटनेने केली आहे. तशा आशयाचे निवेदनही त्यांनी साखर सहसंचालक, अहमदनगर यांच्याकडे दिले आहे.

जर परवानगी दिली तर राहुरी तालुक्यातील सर्व थकीत शेतकर्‍यांसह शेतकरी संघटना कारखान्याच्या गव्हाणीत बसून आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले, साईकृपा साखर कारखान्याने सन 2018-19 ते 2020 मध्ये गाळप केलेल्या उसाचे बील एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांना अद्याप दिलेले नाही.

याबाबत शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी व साखर कारखाना प्रशासनाला अनेक वेळा लेखी व तोंडी मागणी करून देखील अद्याप दिलेली नाही.

शासनाच्या नियमानुसार शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम 15 दिवसांत देणे बंधनकारक असतानाही कारखान्याने सर्व नियम झुगारून शेतकर्‍यांची थट्टा केली आहे.

थकीत रकमेला 15 टक्के दराने व्याजासह रक्कम मिळावी, त्या शिवाय गाळपास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment