‘ही’ आपली संस्कृती आहे ; आ. रोहित पवारांचा मोदींना टोला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी,तूर, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाने पिचलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या शेतकरी मदतीच्या आशेने शेतकऱ्यांकडे पाहत आहे. सध्या आजी माजी सर्वच राजकीय व्यक्ती या परिस्थितीची पाहणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी याना टोला हाणला आहे.

परतीच्या पावसानं राज्यातील पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळं राज्य सरकारपुढं आणखी एक संकट उभं ठाकलं आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा जीएसटीच्या वाट्याची मागणी केली आहे

. ‘दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे…’ असा टोलाही त्यांनी हाणला आहे. संकट मोठं असल्यानं केंद्र सरकारनं मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

तर, केंद्र सरकारची मदत मिळवण्यासाठी काही निकष आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी वेळ जाणार आहे, असं राज्यातील भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या वाट्याच्या जीएसटी परताव्याचा मुद्दा उचलून धरला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment