माजी खा. दिलीप गांधी यांचे पंकजा मुंडेंबद्दल ‘हे’ महत्वपूर्ण वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सर्वसामान्यांचे नेतृत्वाचा स्व.गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे या चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांची कार्याची दखल घेतली आहे.

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले. भाजपाच्या नूतन राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे या गोपीनाथ गड येथील दसरा मेळाव्यास उपस्थित राहून पुण्यात जात असताना माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या.

या वेळी गांधी यांच्यासह माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, की बऱ्याच दिवसांनी नगरला थांबण्याचा योग आला. दिलीप गांधी कुटूंबियांशी मुंडे कुटूंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे.

तसेच शेतकरीही अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने संकटकाळात जास्तीत जास्त मदत जनतेला करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेजचे मी स्वागत करते, मात्र याहून अधिक मोठे पॅकेज देणे अपेक्षित होते. केंद्र सरकारही मोठी मदत सर्व जनतेला या संकटकाळात करत आहे, असे मुंडे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment