खासदार विखे म्हणाले…सत्ता येते जाते, खचुन जाऊ नका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  सत्ता येते जाते, खचुन जाऊ नका असा सल्ला देत पक्ष बदल व सत्ता बदलामुळे सर्वात जास्त नुकसान आमचे झाले मात्र सत्तेसाठी आम्ही जगलो

नाही असे स्पष्ट करत राजकारणाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर समाजकारणाच्या दृष्टीने काम करत आलो असल्याचे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत केले.

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या योगदानामुळे शिर्डीची प्रगती झाली असुन यापुढे होत राहणार आहे. आता भाजपची साथ मिळाली असल्याने आगामी नगरपंचायत निवडणुकीत भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास खा.डॉ.विखे पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी खा.विखे पाटील म्हणाले की,शिर्डीच्या विकासात आ.विखे यांचे योगदान आहे.

निधीचा वापर केल्याने शहरात सर्वांगीन विकास झाला असुन अशीच प्रगती होत राहतील. पक्ष-सत्ता बदलामुळे वडिलांचे मंत्रीपद, आईचे जि.प. अध्यक्षपद गेले, सर्वाधिक नुकसान आमचे झाले असले तरी मी आजही हसत आहे.

सत्ता येते जाते, खचुन जाऊ नका, आज सत्तेत नसलो तरी साईबाबांच्या कृपेने ‘कार्यकर्त्यास आम्ही आर्थिक मदत करण्यास सक्षम आहोत. सत्तेसाठी आम्ही जगलो नाही.

व्यवसाय दृष्टीकोनातुन नव्हेतर समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही काम करत आलो. तसेच विकासाच्या मुद्यावर मतदान होत असते यापुढे ५५ टक्के इतकेच मतदान होईल असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपची साथ आता मिळाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत नगरपंचायतवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment