अवघ्या चारच महिन्यापूर्वी झाले होते लग्न … विवाहित जोडप्याने पाठोपाठ केली आत्महत्या,शहरात हळहळ व्यक्त !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या जामखेडमधील एका विवाहित जोडप्याने पाठोपाठ आत्महत्या केली.

ह्या दोघांनीही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजलेले नाही. आज दुपारी पत्नीने गळफास लावून घेत घरी आत्महत्या केली, याची माहिती मिळताच तिच्या पतीनेही आपल्या कार्यालयात गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जामखेड शहरात बीड रोडवर शिल्पा अजय जाधव (वय २८) या नवविवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना तिचा पती अजय कचरदास जाधव (वय ३२) याला समजली तेव्हा तो आपल्या थंड पाण्याचे जार पुरविणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात होता.

पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यानेही तशाच पद्धतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. एकाच दिवशी तासाभराच्या अंतरातच दोघांनीही आपले जीवन संपविले, अजय याने आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

मात्र, कारण अद्याप स्पष्ट झालेले नव्हते.अजय व शिल्पा या दोघांचा विवाह चार महिन्यांपूर्वीच झाला होता. शिल्पा हिने दुपारी घरात गळफास लावून घेतला. तेव्हा तिचा पती कार्यालयात होता. तिच्या आत्महत्येनंतर शेजारी जमा झाले. पोलिसांनाही बोलाविण्यात आले.

तिने आत्महत्या केल्याची माहिती पतीला कळविण्यात आली. त्यावर त्याने घरी न येता ऑफिसमध्येच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळाल्यावर पुन्हा सर्वांचीच धावपळ उडाली. या दोघांनी एकापाठोपाठ एक आत्महत्या का केल्या याचा उलगडा करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|